शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका; वीज बीलावरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 19:15 IST

Raju Shetty : नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे शेतकऱ्यावर अन्याय

पैठण ( परभणी ) : शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, खरिपातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांनी हात वर केले. अतिवृष्टीचे अनुदान खात्यात जमा झालेले नाही, सरकारने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले पन्नास हजाराचे अनुदान बँकेने जमा केले नाही, अशा प्रकारे नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. सर्व बाजूने शेतकऱ्यांचे येणे बाकी असताना वीज बिलाच्या देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करेल असा इशारा दिला. 

महावितरण वीजचोरी, गळतीची तूट शेतकऱ्यांच्या वीजबीलातून वसूल करते असा आरोप शेट्टी यांनी येवली केला. तसेच महावितरणने शेतकऱ्यांना आकारलेले कृषी पंपाचे बील चुकीचे व अवास्तव असल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या  सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे वसुल करण्या आधी महावितरणने बीलांची दुरूस्ती करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. ऊसाचा भाव घोषित करा म्हणून कारखान्यावर गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने दडपशाही केली, याचा निषेध करत या बाबत चौकशी करण्यात येईल असेही शेट्टी यांनी सांगितले. लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल. तेव्हा कोण दडपशाही करतो ते बघू असे आव्हानही शेट्टी यांनी दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे, बद्रीनाथ बोंबले, साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAurangabadऔरंगाबादagricultureशेतीmahavitaranमहावितरण