शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका; वीज बीलावरून राजू शेट्टींचा सरकारला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 19:15 IST

Raju Shetty : नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे शेतकऱ्यावर अन्याय

पैठण ( परभणी ) : शेतकरी जेवढे बील भरेल तेवढे घ्या व विद्युत पुरवठा सुरळीत करा, आम्हाला कायदा हातात घेण्यास मजबूर करू नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty ) यांनी आज पैठण येथे सरकारला दिला. संत एकनाथ सहकारी साखर कारखाना प्रशासन व शेतकरी संटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेट्टी पैठण येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. 

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले, खरिपातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी विमा कंपन्यांनी हात वर केले. अतिवृष्टीचे अनुदान खात्यात जमा झालेले नाही, सरकारने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषित केलेले पन्नास हजाराचे अनुदान बँकेने जमा केले नाही, अशा प्रकारे नैसर्गिक व प्रशासकीय आपत्तीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा तोडणे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे. सर्व बाजूने शेतकऱ्यांचे येणे बाकी असताना वीज बिलाच्या देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांची अडवणूक करीत आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन आंदोलन करेल असा इशारा दिला. 

महावितरण वीजचोरी, गळतीची तूट शेतकऱ्यांच्या वीजबीलातून वसूल करते असा आरोप शेट्टी यांनी येवली केला. तसेच महावितरणने शेतकऱ्यांना आकारलेले कृषी पंपाचे बील चुकीचे व अवास्तव असल्याचे राज्य सरकारने नियुक्त केलेल्या  सत्यशोधन समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. यामुळे वसुल करण्या आधी महावितरणने बीलांची दुरूस्ती करावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. ऊसाचा भाव घोषित करा म्हणून कारखान्यावर गेलेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर प्रशासनाने दडपशाही केली, याचा निषेध करत या बाबत चौकशी करण्यात येईल असेही शेट्टी यांनी सांगितले. लवकरच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल. तेव्हा कोण दडपशाही करतो ते बघू असे आव्हानही शेट्टी यांनी दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे, पवन शिसोदे, बद्रीनाथ बोंबले, साबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीAurangabadऔरंगाबादagricultureशेतीmahavitaranमहावितरण