शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिधी योजनेतील अर्ज विनाकारण रद्द करू नका, बँकांनी संवेदनशीलतेने काम करावे: भागवत कराड

By विकास राऊत | Updated: September 27, 2022 13:59 IST

जिल्हानिहाय रद्द झालेल्या अर्जांचे सर्वेक्षण करून त्रुटींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पात्र अर्ज मंजूर करावेत.

औरंगाबाद : प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्जदारांचे अर्ज विनाकारण रद्द करू नका. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करावे. जिल्हानिहाय रद्द झालेल्या अर्जांचे सर्वेक्षण करून त्रुटींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पात्र अर्ज मंजूर करण्याच्या सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांनी सोमवारी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात किसान क्रेडिट कार्ड योजना आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनांच्या विभागीय आढावा बैठकीत डॉ. कराड म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत अर्जदारांचे अर्ज विनाकारण रद्द करू नका. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी काम करावे. जिल्हानिहाय रद्द झालेल्या अर्जांचे सर्वेक्षण करून त्रुटींचा अभ्यास करून जास्तीत जास्त पात्र अर्ज मंजूर करावेत. स्वनिधी ते समृद्धी योजनेत औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असून यात परभणी जिल्ह्याचा समावेश करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येतील.बैठकीला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जि. प. सीईओ नीलेश गटणे, उस्मानाबादचे जि. प. सीईओ राहुल गुप्ता, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, मुख्य व्यवस्थापक मंगेश केदारे यांच्यासह विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे व नगर पालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त ऑनलाइन उपस्थित होते.

बँकांनी संवेदनशीलपणे काम करावेमराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता शासन विविध योजना राबवित आहे. बँकांशी संबंधित असणाऱ्या योजनांचे कर्जवाटप करताना बँक अधिकाऱ्यांनी संवेदनशीलपणे काम करावे, अशा सूचना डॉ. कराड यांनी दिल्या. बँकांशी संबंधित योजनांचा मासिक आढावा घ्यावा. किसान क्रेडिट कार्ड योजनेत मासेमारी करणाऱ्या बरोबरच मत्स्यविक्रेत्यांचाही समावेश करणे गरजेचे असल्याचे सांगून मत्स्य व्यवसायाच्या शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBhagwat Karadडॉ. भागवतbankबँक