शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

"जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल"; सत्तारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:42 IST

मंत्रीपद हुकले तरी नाराजी नाही; अडीच वर्षांनंतर मंत्री बनण्याचा अब्दुल सत्तार यांना विश्वास

सिल्लोड: सिल्लोड विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. मी विजयी झाल्यानंतर मतदार आणि कार्यकर्त्यांची मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने ठरवलेल्या अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यामुळे मंत्रीपद स्वीकारण्यापासून थांबावे लागले. मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून मी नाराज नाही. सरकार आपले आहे आणि सिल्लोड- सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच "जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मी पुन्हा येईल," असा इशारा देखील त्यांनी विरोधकांवर टीका करताना दिला.

गुरुवारी सिल्लोड शहरातील सेना भवन येथे दुपारी १२ वाजता झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सत्तार यांनी मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. "विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जातीवादाचा प्रचार केला, पण मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. चौथ्यांदा विजयी होणे हा माझा नाही, तर मतदारांचा विजय आहे," असे सत्तार म्हणाले.  

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, देविदास लोखंडे, प्रभाकर काळे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, श्रीरंग पा.साळवे, मारुती वराडे, पंकज जयस्वाल, अजगर झारेकर, पपींद्र पालसिंग वायटी, इशानसिंग वायटी, हसन पटेल, सतीश ताठे,  रुपेश जयस्वाल, संजय जामकर, माजी नगराध्यक्ष राजश्री निकम, दुर्गाताई पवार, दिपाली पवार, मेघा शहा आदींची उपस्थित होते.  

२०२९ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच"निवडणुका जवळ आल्या की विरोधक मैदानात उतरतात आणि पाच वर्षे लोकांना वाऱ्यावर सोडतात. पण मी तसे करणार नाही. जनतेसाठी मी २४ तास ३६५ दिवस उपलब्ध आहे. आता राज्याची जबाबदारी नसल्याने पूर्णवेळ मतदारसंघासाठी काम करीन," असे त्यांनी आश्वासन दिले. सत्तार यांनी काही गावांमध्ये मताधिक्य घटल्याबाबत चिंता व्यक्त केली. "कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली, तरीही मताधिक्य कमी झाले, याचे आत्मचिंतन करणार आहे. गावागावांत जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार आहे. आजपासूनच २०२९ च्या निवडणुकीची तयारी सुरू करतो आहे," असेही ते म्हणाले.

अडीच वर्षांत पुन्हा मंत्रीपदाचा निर्धार"माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून विरोधकांनी आनंद साजरा करण्याची गरज नाही. अडीज वर्षांनंतर माझे पुनरागमन होईल," असा सत्तार यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना