शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

"जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मंत्री म्हणून मी पुन्हा येईल"; सत्तारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 18:42 IST

मंत्रीपद हुकले तरी नाराजी नाही; अडीच वर्षांनंतर मंत्री बनण्याचा अब्दुल सत्तार यांना विश्वास

सिल्लोड: सिल्लोड विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून होते. मी विजयी झाल्यानंतर मतदार आणि कार्यकर्त्यांची मंत्रीपदाची अपेक्षा होती. मात्र, पक्षाने ठरवलेल्या अडीच वर्षांच्या फॉर्मुल्यामुळे मंत्रीपद स्वीकारण्यापासून थांबावे लागले. मंत्रीपद मिळाले नाही, म्हणून मी नाराज नाही. सरकार आपले आहे आणि सिल्लोड- सोयगाव मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच "जास्त हुशाऱ्या मारू नका, अडीच वर्षांनंतर मी पुन्हा येईल," असा इशारा देखील त्यांनी विरोधकांवर टीका करताना दिला.

गुरुवारी सिल्लोड शहरातील सेना भवन येथे दुपारी १२ वाजता झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात सत्तार यांनी मंत्रीमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच कार्यकर्ते आणि पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडून देणाऱ्या मतदारांचे आभार मानले. हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. "विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी जातीवादाचा प्रचार केला, पण मतदार माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे होते. चौथ्यांदा विजयी होणे हा माझा नाही, तर मतदारांचा विजय आहे," असे सत्तार म्हणाले.  

यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे सभापती केशवराव पा. तायडे, देविदास लोखंडे, प्रभाकर काळे, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, श्रीराम महाजन, रामदास पालोदकर, श्रीरंग पा.साळवे, मारुती वराडे, पंकज जयस्वाल, अजगर झारेकर, पपींद्र पालसिंग वायटी, इशानसिंग वायटी, हसन पटेल, सतीश ताठे,  रुपेश जयस्वाल, संजय जामकर, माजी नगराध्यक्ष राजश्री निकम, दुर्गाताई पवार, दिपाली पवार, मेघा शहा आदींची उपस्थित होते.  

२०२९ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच"निवडणुका जवळ आल्या की विरोधक मैदानात उतरतात आणि पाच वर्षे लोकांना वाऱ्यावर सोडतात. पण मी तसे करणार नाही. जनतेसाठी मी २४ तास ३६५ दिवस उपलब्ध आहे. आता राज्याची जबाबदारी नसल्याने पूर्णवेळ मतदारसंघासाठी काम करीन," असे त्यांनी आश्वासन दिले. सत्तार यांनी काही गावांमध्ये मताधिक्य घटल्याबाबत चिंता व्यक्त केली. "कोट्यवधी रुपयांचा निधी आणून विकासकामे केली, तरीही मताधिक्य कमी झाले, याचे आत्मचिंतन करणार आहे. गावागावांत जाऊन कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधणार आहे. आजपासूनच २०२९ च्या निवडणुकीची तयारी सुरू करतो आहे," असेही ते म्हणाले.

अडीच वर्षांत पुन्हा मंत्रीपदाचा निर्धार"माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. मंत्रीपद मिळाले नाही म्हणून विरोधकांनी आनंद साजरा करण्याची गरज नाही. अडीज वर्षांनंतर माझे पुनरागमन होईल," असा सत्तार यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAbdul Sattarअब्दुल सत्तारShiv Senaशिवसेना