शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

पैसे उकळणाऱ्यांपासून डॉक्टरांना संरक्षणाची गरज; उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2024 11:28 IST

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगावच्या डॉक्टरांवरील वैद्यकीय निष्काळजीपणाचा खटला रद्द करताना म्हटले आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती

छत्रपती संभाजीनगर : नुकसानभरपाई मिळवण्याच्या उद्देशाने म्हणून वैद्यकीय व्यावसायिकांवर बोगस खटले दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे, असे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने जळगावच्या डॉक्टरांवरील वैद्यकीय निष्काळजीपणाचा खटला रद्द करताना म्हटले आहे. डॉ. प्रशांत अहिरे यांनी १३ ते १६ मे २०२१ या कालावधीत गायत्री पाटील यांच्यावर उपचार केले. त्यानंतर गायत्री यांची प्रकृती खालावली. नंतर त्यांच्यावर तीन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले, वैद्यक व्यावसायिकांविरुद्ध पण १ जून २०२१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर अहिरे यांनी चुकीचे उपचार केल्याने गायत्री यांचा जीव गेला, असा आरोप पतीने केला. चौकशीसाठी डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली. १५ सप्टेंबर २०२२ च्या तज्ज्ञ समितीच्या अहवालात डॉ. अहिरे यांनी आयुर्वेदिक डॉक्टर असूनही अॅलोपॅथी औषधांचे 'अतार्किक डोस' दिल्याचे म्हटले.

डॉक्टर निर्दोषच 

डॉ. अहिरेंविरुद्ध कलम ३०४-अ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) आयपीसीचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले.

डॉ. अहिरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. हायकोर्टान खटला रद्द करताना डॉ. अहिरे यांची भूमिका पहिल्या चार दिवसांच्या उपचारापुरती मर्यादित असल्याचे नमूद केले.

उपचाराच्या कागदपत्रांवरून मेंदूत रक्तस्राव झाल्याचे स्पष्टपणे दिसून येते. तज्ज्ञ समितीच्या अहवालात मेंदूतील रक्तस्राव आणि गायत्री यांच्या मृत्यूसाठी औषधांचे अतार्किक डोस कारणीभूत होते, असे कुठेही म्हटलेले नाही, असे निरीक्षण नोंदवले.

गुजरात हायकोर्टानेही रोगनिदान चुकण्याला वैद्यकीय निष्काळजीपणा म्हणता येणार नाही, असा निर्णय दिला आहे.