शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा ...

योगेश पायघन

औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा काढल्यानंतर आलेल्या वाईट अनुभवांमुळे पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याने जिल्ह्यात २०१८ मध्ये ६.३६ लाख, २०१९ मध्ये १०.७६ लाख, २०२० मध्ये ८.२४ लाख तर २०२१ मध्ये मुदतवाढ मिळूनही केवळ ५ लाख ४१ हजार ५०४ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.

---

यंदा केवळ ३५ टक्के पिकांचा विमा

---

-जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७० हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरवर (९५.७१ टक्के) शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत.

-जिल्ह्यातील ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरपैकी २ लाख ३१ हजार ७०५ हेक्टरवरील पीक लागवडीचा विमा उतरविला आहे.

-गेल्या वर्षी पीकविम्याचा अत्यल्प लाभ मिळाल्याने एकूण खरीप पेरणीपैकी केवळ ३५ टक्के पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला आहे.

--

विम्याचे प्रमाण घटण्याची कारणे अनेक

--

विमा भरण्याच्या अंतिम तारखेवेळी चांगला पाऊस-पाणी, पीकपरिस्थिती चांगली होती, तसेच गेल्यावेळी विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्याच्या आलेल्या अनुभवातून नाराज शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवली. तर, सातबारा आणि विमा पोर्टल लिंक झाल्याने डुप्लिकेशन पण थांबल्याने यावर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.

-डाॅ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधीक्षक, औरंगाबाद

---

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

५,८५,७६५

---

पीकविमा काढलेले शेतकरी

--

गतवर्षी - ८,३०,७४८

यावर्षी -५,४१,५०४

---

६,७५,१७० हेक्टर सरासरी खरीप क्षेत्र

६,४६,२१३ हेक्टर एकूण खरीप पेरणी

--

पीक - प्रत्यक्ष पेरणी

कापूस - ३,५३,३९९

मका - १,६९,०५०

सोयाबीन - २६,७०३

बाजरी - २२,८७५

तूर - ४१,४०५

उडीद - ४,२०१

मूग - १३,५८०

भुईमूग - ६,१८५

ज्वारी - ४६०

----

गतवर्षीचा अनुभव वाईट....

--

गेल्यावेळी विमा काढून नुकसान झाल्यावर वेगवेगळी तांत्रिक कारणे दाखवून विमा नाकारल्या गेला. दरवेळी काहीतरी कारणे दाखवून विमा संरक्षक असताना विम्याचा लाभ मिळत नाही, मग विमा काढून काय उपयोग? त्यामुळे यावर्षी विमा काढला नाही. सध्यातरी पीकपरिस्थिती चांगली आहे. शेवटी शेतकऱ्यांचे नशीबच असते.

-कैलास पंडित, शेतकरी

---

पीक, फळपीक विमा भरूनही त्याचा लाभ गरज पडते तेव्हा मिळत नाही. निसर्गाचा कोप झाल्यावर विम्याची मदत मिळण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षित तुटपुंजी मदतही मिळत नाही. अनेकदा तक्रारी करून थातूरमातूर उत्तरे विमा कंपन्या देतात. दरवेळी विमालाभाची रक्कम कमी आणि त्यासाठी कागदोपत्री खर्चच अधिक होतो. त्यात विमा भरण्यासाठीही कसरत करावी लागते. गेल्यावेळी नुकसान होऊन हाती काहीच आले नाही.

-प्रकाश आगे, शेतकरी