शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!
3
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
4
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
5
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys, Wipro टॉप लूझर्स
6
महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका
7
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
8
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
9
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
10
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
11
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
12
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
14
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
15
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
16
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
17
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
18
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
19
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
20
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा ...

योगेश पायघन

औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा काढल्यानंतर आलेल्या वाईट अनुभवांमुळे पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याने जिल्ह्यात २०१८ मध्ये ६.३६ लाख, २०१९ मध्ये १०.७६ लाख, २०२० मध्ये ८.२४ लाख तर २०२१ मध्ये मुदतवाढ मिळूनही केवळ ५ लाख ४१ हजार ५०४ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.

---

यंदा केवळ ३५ टक्के पिकांचा विमा

---

-जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७० हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरवर (९५.७१ टक्के) शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत.

-जिल्ह्यातील ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरपैकी २ लाख ३१ हजार ७०५ हेक्टरवरील पीक लागवडीचा विमा उतरविला आहे.

-गेल्या वर्षी पीकविम्याचा अत्यल्प लाभ मिळाल्याने एकूण खरीप पेरणीपैकी केवळ ३५ टक्के पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला आहे.

--

विम्याचे प्रमाण घटण्याची कारणे अनेक

--

विमा भरण्याच्या अंतिम तारखेवेळी चांगला पाऊस-पाणी, पीकपरिस्थिती चांगली होती, तसेच गेल्यावेळी विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्याच्या आलेल्या अनुभवातून नाराज शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवली. तर, सातबारा आणि विमा पोर्टल लिंक झाल्याने डुप्लिकेशन पण थांबल्याने यावर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.

-डाॅ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधीक्षक, औरंगाबाद

---

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

५,८५,७६५

---

पीकविमा काढलेले शेतकरी

--

गतवर्षी - ८,३०,७४८

यावर्षी -५,४१,५०४

---

६,७५,१७० हेक्टर सरासरी खरीप क्षेत्र

६,४६,२१३ हेक्टर एकूण खरीप पेरणी

--

पीक - प्रत्यक्ष पेरणी

कापूस - ३,५३,३९९

मका - १,६९,०५०

सोयाबीन - २६,७०३

बाजरी - २२,८७५

तूर - ४१,४०५

उडीद - ४,२०१

मूग - १३,५८०

भुईमूग - ६,१८५

ज्वारी - ४६०

----

गतवर्षीचा अनुभव वाईट....

--

गेल्यावेळी विमा काढून नुकसान झाल्यावर वेगवेगळी तांत्रिक कारणे दाखवून विमा नाकारल्या गेला. दरवेळी काहीतरी कारणे दाखवून विमा संरक्षक असताना विम्याचा लाभ मिळत नाही, मग विमा काढून काय उपयोग? त्यामुळे यावर्षी विमा काढला नाही. सध्यातरी पीकपरिस्थिती चांगली आहे. शेवटी शेतकऱ्यांचे नशीबच असते.

-कैलास पंडित, शेतकरी

---

पीक, फळपीक विमा भरूनही त्याचा लाभ गरज पडते तेव्हा मिळत नाही. निसर्गाचा कोप झाल्यावर विम्याची मदत मिळण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षित तुटपुंजी मदतही मिळत नाही. अनेकदा तक्रारी करून थातूरमातूर उत्तरे विमा कंपन्या देतात. दरवेळी विमालाभाची रक्कम कमी आणि त्यासाठी कागदोपत्री खर्चच अधिक होतो. त्यात विमा भरण्यासाठीही कसरत करावी लागते. गेल्यावेळी नुकसान होऊन हाती काहीच आले नाही.

-प्रकाश आगे, शेतकरी