शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

कंपन्यांचे दुकान भरण्यासाठी पीकविमा काढायचा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा ...

योगेश पायघन

औरंगाबाद : पिकांना संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीकविमा योजनेकडे शेतकरी दिवसेंदिवस पाठ फिरवत आहे. पीकविमा काढल्यानंतर आलेल्या वाईट अनुभवांमुळे पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होत असल्याने जिल्ह्यात २०१८ मध्ये ६.३६ लाख, २०१९ मध्ये १०.७६ लाख, २०२० मध्ये ८.२४ लाख तर २०२१ मध्ये मुदतवाढ मिळूनही केवळ ५ लाख ४१ हजार ५०४ शेतकऱ्यांनीच पीकविमा काढला आहे.

---

यंदा केवळ ३५ टक्के पिकांचा विमा

---

-जिल्ह्यात सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ६ लाख ७५ हजार १७० हेक्टर असून आतापर्यंत ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरवर (९५.७१ टक्के) शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत.

-जिल्ह्यातील ६ लाख ४६ हजार २१३ हेक्टरपैकी २ लाख ३१ हजार ७०५ हेक्टरवरील पीक लागवडीचा विमा उतरविला आहे.

-गेल्या वर्षी पीकविम्याचा अत्यल्प लाभ मिळाल्याने एकूण खरीप पेरणीपैकी केवळ ३५ टक्के पिकांचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला आहे.

--

विम्याचे प्रमाण घटण्याची कारणे अनेक

--

विमा भरण्याच्या अंतिम तारखेवेळी चांगला पाऊस-पाणी, पीकपरिस्थिती चांगली होती, तसेच गेल्यावेळी विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्याच्या आलेल्या अनुभवातून नाराज शेतकरी पीकविम्याकडे पाठ फिरवली. तर, सातबारा आणि विमा पोर्टल लिंक झाल्याने डुप्लिकेशन पण थांबल्याने यावर्षी विमा काढणाऱ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.

-डाॅ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी अधीक्षक, औरंगाबाद

---

जिल्ह्यातील एकूण शेतकरी

५,८५,७६५

---

पीकविमा काढलेले शेतकरी

--

गतवर्षी - ८,३०,७४८

यावर्षी -५,४१,५०४

---

६,७५,१७० हेक्टर सरासरी खरीप क्षेत्र

६,४६,२१३ हेक्टर एकूण खरीप पेरणी

--

पीक - प्रत्यक्ष पेरणी

कापूस - ३,५३,३९९

मका - १,६९,०५०

सोयाबीन - २६,७०३

बाजरी - २२,८७५

तूर - ४१,४०५

उडीद - ४,२०१

मूग - १३,५८०

भुईमूग - ६,१८५

ज्वारी - ४६०

----

गतवर्षीचा अनुभव वाईट....

--

गेल्यावेळी विमा काढून नुकसान झाल्यावर वेगवेगळी तांत्रिक कारणे दाखवून विमा नाकारल्या गेला. दरवेळी काहीतरी कारणे दाखवून विमा संरक्षक असताना विम्याचा लाभ मिळत नाही, मग विमा काढून काय उपयोग? त्यामुळे यावर्षी विमा काढला नाही. सध्यातरी पीकपरिस्थिती चांगली आहे. शेवटी शेतकऱ्यांचे नशीबच असते.

-कैलास पंडित, शेतकरी

---

पीक, फळपीक विमा भरूनही त्याचा लाभ गरज पडते तेव्हा मिळत नाही. निसर्गाचा कोप झाल्यावर विम्याची मदत मिळण्याची अपेक्षा असते. ती अपेक्षित तुटपुंजी मदतही मिळत नाही. अनेकदा तक्रारी करून थातूरमातूर उत्तरे विमा कंपन्या देतात. दरवेळी विमालाभाची रक्कम कमी आणि त्यासाठी कागदोपत्री खर्चच अधिक होतो. त्यात विमा भरण्यासाठीही कसरत करावी लागते. गेल्यावेळी नुकसान होऊन हाती काहीच आले नाही.

-प्रकाश आगे, शेतकरी