शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

 रेल्वेत बेवारस सापडलेल्या सामानाचे काय करतात, माहित आहे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 19:59 IST

रेल्वे डब्यात वा स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्यास प्रथम तर याच्या मालकाचा शोध घेतला जातो.

औरंगाबाद : रेल्वे डब्यात वा स्थानकावर बेवारस बॅग आढळून आल्यास याच्या मालकाचा शोध घेतला जातो. तो मिळून न आल्यास या वस्तूचा पंचनामा करून पार्सल विभागात याचा लिलाव करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

विचारांच्या तंद्रीत असताना वा गर्दीमुळे उतरण्याची घाई केल्याने प्रवासी रेल्वेतच त्यांचे सामान विसरत असल्याचे अनेक घटनांवरून आढळून आले आहे. स्थानकावरही काहीवेळा प्रवासी आपले सामान कुठल्याही कारणास्तव विसरतात. रेल्वे पोलिसांना गस्तीवर असताना ही बाब निदर्शनास येते. हे सामान जप्त केले जाते.

या सामानात संबंधित प्रवाशाचा संपर्क क्रमांक, पत्ता आढळून आल्यास त्याच्याशी संपर्क साधून हे सामान त्याला परत दिले जाते; परंतु बॅग वा सुटकेसमध्ये प्रवाशाचा पुरावा आढळून न आल्यास बॅग, सुटकेसमध्ये असलेल्या मौल्यवान वस्तंूसह बॅगचा पंचनामा करून ते रेल्वेच्या विभागाकडे हस्तांतरित केले जाते. ‘लॉस आॅफ प्रॉपर्टी’ म्हणून सहा महिने याची प्रतीक्षा केल्यानंतर याचा जाहीररीत्या लिलाव केला जातो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असाच प्रकार पार्सल विभागात घडत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्याने दुचाकी वाहन पार्सलद्वारे पाठवले असेल; पण त्याच्याकडे कागदपत्र नसतील तर ते वाहन सोडविण्यासाठी येत नाही. ते वाहन असेच पार्सल विभागात पडून राहते. त्याचाही सहा महिन्यांनंतर लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यातून मिळणारे पैसे हे रेल्वे प्रशासनाकडे जमा केले जातात.

गत आठ महिन्यांत सहा-सात वस्तू सापडल्याने त्या वस्तू संबंधित प्रवाशांना परत देण्यात आलेल्या आहेत. ज्या वस्तूंचे मालक आढळून आले नाहीत, अशा वस्तू ‘लॉस आॅफ प्रॉपर्टी’ संबोधून त्यांचा लिलाव करण्यात आल्याचे रेल्वे पोलीस निरीक्षक अरविंदकुमार शर्मा यांनी सांगितले. रेल्वे प्रवासी सेनेचे संतोषकुमार सोमाणी यांनीही अनेकदा प्रवाशांचे विसरलेले सामान परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संवादामुळे असंख्य प्रवाशांना मिळाले साहित्यजालना आणि नगरसोल स्थानकादरम्यान औरंगाबाद हे केंद्र येते. त्यामुळे दोन्ही दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना त्यांचे सामान रेल्वे डब्यातच राहिल्याचे लक्षात आले, तर तात्काळ पुढील स्थानकावरील रेल्वे पोलिसांना कळविले जाते. त्यामुळे असंख्य प्रवाशांना जलद संवादामुळे आपले साहित्य मिळाले आहे. 

संबंधितांचा शोध घेतला जातोबेवारस वस्तू आढळून आल्यास संबंधितांचा शोध घेतला जातो; परंतु तो न मिळाल्यास त्या वस्तूंचा पंचनामा करून रेल्वे प्रशासनाकडे जमा केली जाते. सहा महिने प्रतीक्षा करून त्याचा अधिकृतरीत्या लिलाव होतो. यातून येणारी रक्कम रेल्वे प्रशासनाकडे जमा केली जाते. - अरविंदकुमार शर्मा, निरीक्षक, रेल्वे पोलीस बल, औरंगाबाद

टॅग्स :railwayरेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिस