शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार नाही- पवार

By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST

जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संपूर्ण राज्यात पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत सरकारने पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई संदर्भात सर्वोतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून, सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यांची चिंतनीय स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवरच त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना बजावल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासावेत, त्यातून पुढील नियोजन करावेत, असे आदेश दिले गेल्या आहेत. जायकवाडीतील उपयुक्त व मृत साठ्यातून पिण्याएवढे पाणी पुरेल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या टंचाईस सदृश्य स्थितीत सर्वतोपरी जलदगतीने निर्णय घेतले जातील याची ग्वाही दिली. यावेळी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी टँकरने तसेच विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी आ.चंद्रकांत दानवे, जिल्हाधिकारी एस.आर.रंगानायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संशयास्पद आगीची चौकशी होणार महावितरण कंपनीच्या पोलिस ठाण्यातील संशयास्पद आगीची प्रकरणाची राज्य सरकारद्वारे चौकशीद्वारे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यात पत्रकरांशी बोलताना दिली.सहा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असणाऱ्या या कार्यालयातील कपाटास आग लागावी, त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज भस्म व्हावेत, विशेषत: केवळ एफआयआरची कागदपत्रे नष्ट व्हावीत हे सकृतदर्शनी संशयास्पद वाटत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच या संशयाबाबत खातरजमा व्हावी म्हणून राज्य सरकारने स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी म्हटले.