शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणीकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
5
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
6
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
8
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
9
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
10
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
11
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
13
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
14
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
15
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
16
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
17
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
18
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
19
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
20
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!

कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार नाही- पवार

By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST

जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संपूर्ण राज्यात पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत सरकारने पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई संदर्भात सर्वोतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून, सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यांची चिंतनीय स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवरच त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना बजावल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासावेत, त्यातून पुढील नियोजन करावेत, असे आदेश दिले गेल्या आहेत. जायकवाडीतील उपयुक्त व मृत साठ्यातून पिण्याएवढे पाणी पुरेल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या टंचाईस सदृश्य स्थितीत सर्वतोपरी जलदगतीने निर्णय घेतले जातील याची ग्वाही दिली. यावेळी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी टँकरने तसेच विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी आ.चंद्रकांत दानवे, जिल्हाधिकारी एस.आर.रंगानायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संशयास्पद आगीची चौकशी होणार महावितरण कंपनीच्या पोलिस ठाण्यातील संशयास्पद आगीची प्रकरणाची राज्य सरकारद्वारे चौकशीद्वारे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यात पत्रकरांशी बोलताना दिली.सहा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असणाऱ्या या कार्यालयातील कपाटास आग लागावी, त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज भस्म व्हावेत, विशेषत: केवळ एफआयआरची कागदपत्रे नष्ट व्हावीत हे सकृतदर्शनी संशयास्पद वाटत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच या संशयाबाबत खातरजमा व्हावी म्हणून राज्य सरकारने स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी म्हटले.