शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पाऊस पाडण्याचा विचार नाही- पवार

By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST

जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

जालना: गेल्या वर्षीचा कृत्रिम पावसासंदर्भातला अनुभव वाईट आहे. त्यामुळे यावर्षी कृत्रिम पाऊस पाडण्या संदर्भात राज्य सरकारने कोणताही विचार केलेला नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संपूर्ण राज्यात पाऊस लांबल्यामुळेच खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या आहेत. तसेच सर्वदूर चिंतेचे वातावरण पसरले आहे. या परिस्थितीत सरकारने पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई संदर्भात सर्वोतोपरी उपाययोजना अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून, सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यांची चिंतनीय स्थिती असल्याच्या पार्श्वभूमीवरच त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्या पाण्याचा अत्यंत काटेकोरपणे वापर करण्याच्या सूचना बजावल्या आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनांचेही स्त्रोत तपासावेत, त्यातून पुढील नियोजन करावेत, असे आदेश दिले गेल्या आहेत. जायकवाडीतील उपयुक्त व मृत साठ्यातून पिण्याएवढे पाणी पुरेल असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री पवार यांनी या टंचाईस सदृश्य स्थितीत सर्वतोपरी जलदगतीने निर्णय घेतले जातील याची ग्वाही दिली. यावेळी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ग्रामीण भागात आवश्यक त्या ठिकाणी टँकरने तसेच विहिरी अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी आ.चंद्रकांत दानवे, जिल्हाधिकारी एस.आर.रंगानायक, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संशयास्पद आगीची चौकशी होणार महावितरण कंपनीच्या पोलिस ठाण्यातील संशयास्पद आगीची प्रकरणाची राज्य सरकारद्वारे चौकशीद्वारे केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जालन्यात पत्रकरांशी बोलताना दिली.सहा जिल्ह्यांसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे असणाऱ्या या कार्यालयातील कपाटास आग लागावी, त्यात महत्वपूर्ण दस्तऐवज भस्म व्हावेत, विशेषत: केवळ एफआयआरची कागदपत्रे नष्ट व्हावीत हे सकृतदर्शनी संशयास्पद वाटत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच या संशयाबाबत खातरजमा व्हावी म्हणून राज्य सरकारने स्वतंत्रपणे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पवार यांनी म्हटले.