शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

पावसाचे पाणी आमच्या शेतात सोडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:09 IST

औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : भूसंपादनानंतर उर्वरित जमिनीतील माती वाहून जाणार

औरंगाबाद : सोलापूर औरंगाबाद राष्टÑीय महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भालगाव येथे रस्त्याच्या डाव्या बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी विरुद्ध दिशेला शेतकऱ्यांच्या शेतात सोडण्यात येत आहे. या प्रक्रियेला शेतकºयांनी मंगळवारी कडाडून विरोध दर्शविला. अगोदरच आमच्या जमिनी घेऊन राष्टÑीय महामार्ग करण्यात येत आहे. उर्वरित जमिनीत पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल, राष्टÑीय महामार्ग अधिकाºयांनी यात मार्ग काढावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.अब्दुल वाहब अब्दुल बारी कुरैशी, रफिया बेगम यांनी राष्टÑीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, भालगाव येथील गट नं. ३५० मधील ११०० चौरस मीटर क्षेत्र राष्टÑीय महामार्गासाठी २०१६ मध्ये घेण्यात आले. या जागेचा अर्धाच मोबदला मिळाला आहे. उर्वरित मोबदल्यासाठी आजही जिल्हाधिकारी कार्यालयाचे उंबरठे या भागातील शेतकºयांना झिजवावे लागत आहेत. त्यातच रस्त्याचे काम करणाºया अधिकारी व कंत्राटदारांनी विरुद्ध बाजूचे सांडपाणी, पावसाचे पाणी आमच्या शेतासमोर आणून सोडण्याचा निर्णय घेतला. मोठ-मोठे पाईप टाकून काम सुरू केले. सुरुवातीला शेतासमोर मोठी सिमेंटची नाली बांधून पाणी वाहून नेण्यात येईल, असे शेतकºयांना सांगितले. आता थेट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेतात ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्यावर पाणी सोडल्यास संपूर्ण माती वाहून जाईल. या कामामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे काम करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी