शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

धीर सोडू नका... अनुदानाचा लाभ घ्या !

By admin | Updated: April 17, 2015 00:43 IST

बीड : गतआठवड्यात बरसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदरही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून

बीड : गतआठवड्यात बरसलेल्या अवकाळीच्या तडाख्याने फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अगोदरही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून आता फळबागांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. त्यामुळे बळीराजाने अनुदान पदरात पाडून घेणे महत्त्वाचे असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक आर.एस. भताने यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.नुकसानीची तीव्रता लक्षात घेता नुकसान क्षेत्राच्या अनुमानामध्ये बदल करण्यात आला असून दर हेक्टरीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे. यापुर्वी ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळत होती. यामध्ये बदल करून ३३ टक्के नुकसान झाल्यासही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे. तर दर हेक्टरी ४५०० रुपये मिळणाऱ्या रकमेत बदल करण्यात आला असून आता ६८०० रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडणार आहेत. नुकसानीची तीव्रता अधिक असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जात आहे. त्या अनुषंगाने पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून गुरूवारपर्यंत १७०० हेक्टर बागांच्या नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. अवकाळी हा शेतकऱ्यांच्या जीवावर बेतला असून याचा सामना करण्यासाठी उर्वरित फळबागांची काळजी घेणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरू होण्यास तीन महिन्याचा अवकाश आहे. कमी कालावधीमध्ये शेतकऱ्यांना इतर पिके घेणे शक्य नाही. त्यामुळे उर्वरीत काळात शेतीची योग्य प्रकारे मशागत करून संकटामुळे कोलमोडून न जाता पुन्हा जोमाने कामला सुरवात करणे महत्वाचे आहे. याकरिता उताराला आडवी नांगरणीतून मशागत करून जलसंधारणेचे काम करावे असे आवाहनही जिल्हा कृषि अधीक्षक रमेश भताने यांनी केले आहे. (प्रतिनिधी)