शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:57 IST

जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

ठळक मुद्देमनपाची विनंती : जलसंपदा विभागाला पत्र

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागाला थकबाकी भरण्याची कारवाई सुरू असल्याचे कळविले आहे. या पत्रावर जलसंपदा विभागाचे समाधान न झाल्यास गुरुवारी दोन तास पाणी उपसा थांबविण्यात येईल.जायकवाडी धरणातून दररोज १५० एमएलडी पाणी मनपा घेत आहे. मनपाने जेवढे पाणी घेतले, तेवढ्या पाण्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे; मात्र मागील ५ वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नाही. पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून तब्बल १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. शेवटी पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, अशी नोटीस १३ डिसेंबर रोजी मनपाला बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही कळविण्यात आले आहे.समांतरच्या कंपनीची थकबाकीजलसंपदा खात्याने मनपाला पाणीपट्टी शुल्काची नोटीस बजावली आहे; परंतु यातील ६ कोटी रुपयांची थकबाकी ही समांतरच्या ठेकेदार कंपनीच्या काळातील आहे. मनपाने १ सप्टेंबर २०१४ पासून शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविलेली होती. पुढे दोन वर्षे म्हणजे १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हे काम कंपनीकडे होते. या काळात कंपनीने जलसंपदाकडे पाणीपट्टीचे शुल्क भरलेच नाही, त्यामुळे आता मनपाकडील थकबाकीची रक्कम अधिक दिसत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले.पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर- जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर- चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर - सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर- आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर -पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक