शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:57 IST

जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

ठळक मुद्देमनपाची विनंती : जलसंपदा विभागाला पत्र

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागाला थकबाकी भरण्याची कारवाई सुरू असल्याचे कळविले आहे. या पत्रावर जलसंपदा विभागाचे समाधान न झाल्यास गुरुवारी दोन तास पाणी उपसा थांबविण्यात येईल.जायकवाडी धरणातून दररोज १५० एमएलडी पाणी मनपा घेत आहे. मनपाने जेवढे पाणी घेतले, तेवढ्या पाण्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे; मात्र मागील ५ वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नाही. पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून तब्बल १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. शेवटी पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, अशी नोटीस १३ डिसेंबर रोजी मनपाला बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही कळविण्यात आले आहे.समांतरच्या कंपनीची थकबाकीजलसंपदा खात्याने मनपाला पाणीपट्टी शुल्काची नोटीस बजावली आहे; परंतु यातील ६ कोटी रुपयांची थकबाकी ही समांतरच्या ठेकेदार कंपनीच्या काळातील आहे. मनपाने १ सप्टेंबर २०१४ पासून शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविलेली होती. पुढे दोन वर्षे म्हणजे १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हे काम कंपनीकडे होते. या काळात कंपनीने जलसंपदाकडे पाणीपट्टीचे शुल्क भरलेच नाही, त्यामुळे आता मनपाकडील थकबाकीची रक्कम अधिक दिसत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले.पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर- जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर- चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर - सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर- आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर -पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक