शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 23:57 IST

जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

ठळक मुद्देमनपाची विनंती : जलसंपदा विभागाला पत्र

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागाला थकबाकी भरण्याची कारवाई सुरू असल्याचे कळविले आहे. या पत्रावर जलसंपदा विभागाचे समाधान न झाल्यास गुरुवारी दोन तास पाणी उपसा थांबविण्यात येईल.जायकवाडी धरणातून दररोज १५० एमएलडी पाणी मनपा घेत आहे. मनपाने जेवढे पाणी घेतले, तेवढ्या पाण्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे; मात्र मागील ५ वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नाही. पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून तब्बल १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. शेवटी पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, अशी नोटीस १३ डिसेंबर रोजी मनपाला बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही कळविण्यात आले आहे.समांतरच्या कंपनीची थकबाकीजलसंपदा खात्याने मनपाला पाणीपट्टी शुल्काची नोटीस बजावली आहे; परंतु यातील ६ कोटी रुपयांची थकबाकी ही समांतरच्या ठेकेदार कंपनीच्या काळातील आहे. मनपाने १ सप्टेंबर २०१४ पासून शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविलेली होती. पुढे दोन वर्षे म्हणजे १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हे काम कंपनीकडे होते. या काळात कंपनीने जलसंपदाकडे पाणीपट्टीचे शुल्क भरलेच नाही, त्यामुळे आता मनपाकडील थकबाकीची रक्कम अधिक दिसत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले.पाणी कपातीचा कार्यक्रम२७ डिसेंबर- जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.२८ डिसेंबर- चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.२९ डिसेंबर - सहा तास उपसा बंद राहील.३० डिसेंबर- आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.३१ डिसेंबर -पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater transportजलवाहतूक