शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

सुंदोपसुंदीमुळे कुलगुरू निवडीवर एकमत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:12 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी ...

ठळक मुद्देविद्यापीठ : स्थानिक करायचा की बाहेरचा? राजकीय नेत्यांमध्ये खल

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी (दि.५) घेतल्या. यास चार दिवस उलटले तरी अद्यापही कुलगुरूंची निवड होत नाही. राज्य शासनातील काही मंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे निवड लांबणीवर पडत आहे. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायचे की, बाहेरच्या यावर एकमत होत नसल्यामुळे ही निवड रेंगाळली असल्याचे समजते.विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच जणांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नागपूरचे डॉ. प्रमोद येवले आणि औरंगाबादचे डॉ. के.व्ही. काळे यांच्यात चुरस असल्याचे चित्र पहिल्यापासून निर्माण झाली होती. औरंगाबाद येथील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. काळे यांचे नाव लावून धरले होते. तशा पद्धतीचे संदेश मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याचवेळी राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या नागपुरातील डॉ. येवले यांनी जोर लावल्यामुळे ही निवड थांबली आहे. शनिवार व रविवार राज्यपाल दौºयावर होते. त्यामुळे निर्णय झाला नाही. सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, औरंगाबादच्या दौºयावर आलेले जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही कार्यकर्त्यांशी बोलताना कुलगुरूंची निवड लांबण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे कुलगुरूंच्या निवडीमध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप सुरू असल्यामुळे निवड लांबणीवर गेली आहे. कुलगुरूंच्या निवडीची उत्सुकताही ताणल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात कोण होणार कुलगुरू? या चर्चेला उधाण आले आहे. डॉ. येवले व डॉ. काळे यांच्यासह नांदेड येथील डॉ. रघुनाथ होळंबे, कोल्हापूर येथील डॉ. विजय फुलारी, नाशिक येथील डॉ. धनंजय माने हे सुद्धा स्पर्धेत आहेत. यात आघाडीवर असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात हितचिंतकांनी तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इतर नावांचाही विचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चौकट,विधि विद्यापीठाचे त्रांगडे सुटेनाऔरंगाबादेतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवडही लांबली आहे. या विद्यापीठाला मागील सहा महिन्यांपासून पूर्णवेळ कुलगुरू नाही. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने १४ जणांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यापैकी चार नावांची शिफारस कुलपतींकडे केली. मात्र, अद्यापही कुलपतींनी निर्णय घेतलेला नाही. यामुळे औरंगाबादेतील दोन्ही विद्यापीठे कुलगुरूंच्या प्रतीक्षेत आहेत.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ