शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सुंदोपसुंदीमुळे कुलगुरू निवडीवर एकमत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:12 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी ...

ठळक मुद्देविद्यापीठ : स्थानिक करायचा की बाहेरचा? राजकीय नेत्यांमध्ये खल

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी (दि.५) घेतल्या. यास चार दिवस उलटले तरी अद्यापही कुलगुरूंची निवड होत नाही. राज्य शासनातील काही मंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे निवड लांबणीवर पडत आहे. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायचे की, बाहेरच्या यावर एकमत होत नसल्यामुळे ही निवड रेंगाळली असल्याचे समजते.विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच जणांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नागपूरचे डॉ. प्रमोद येवले आणि औरंगाबादचे डॉ. के.व्ही. काळे यांच्यात चुरस असल्याचे चित्र पहिल्यापासून निर्माण झाली होती. औरंगाबाद येथील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. काळे यांचे नाव लावून धरले होते. तशा पद्धतीचे संदेश मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याचवेळी राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या नागपुरातील डॉ. येवले यांनी जोर लावल्यामुळे ही निवड थांबली आहे. शनिवार व रविवार राज्यपाल दौºयावर होते. त्यामुळे निर्णय झाला नाही. सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, औरंगाबादच्या दौºयावर आलेले जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही कार्यकर्त्यांशी बोलताना कुलगुरूंची निवड लांबण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे कुलगुरूंच्या निवडीमध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप सुरू असल्यामुळे निवड लांबणीवर गेली आहे. कुलगुरूंच्या निवडीची उत्सुकताही ताणल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात कोण होणार कुलगुरू? या चर्चेला उधाण आले आहे. डॉ. येवले व डॉ. काळे यांच्यासह नांदेड येथील डॉ. रघुनाथ होळंबे, कोल्हापूर येथील डॉ. विजय फुलारी, नाशिक येथील डॉ. धनंजय माने हे सुद्धा स्पर्धेत आहेत. यात आघाडीवर असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात हितचिंतकांनी तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इतर नावांचाही विचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चौकट,विधि विद्यापीठाचे त्रांगडे सुटेनाऔरंगाबादेतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवडही लांबली आहे. या विद्यापीठाला मागील सहा महिन्यांपासून पूर्णवेळ कुलगुरू नाही. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने १४ जणांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यापैकी चार नावांची शिफारस कुलपतींकडे केली. मात्र, अद्यापही कुलपतींनी निर्णय घेतलेला नाही. यामुळे औरंगाबादेतील दोन्ही विद्यापीठे कुलगुरूंच्या प्रतीक्षेत आहेत.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ