शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

सुंदोपसुंदीमुळे कुलगुरू निवडीवर एकमत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:12 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी ...

ठळक मुद्देविद्यापीठ : स्थानिक करायचा की बाहेरचा? राजकीय नेत्यांमध्ये खल

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्यपाल तथा कुलपतींनी शोध समितीने शिफारस केलेल्या पाच उमेदवारांच्या मुलाखती शुक्रवारी (दि.५) घेतल्या. यास चार दिवस उलटले तरी अद्यापही कुलगुरूंची निवड होत नाही. राज्य शासनातील काही मंत्र्यांसह राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे निवड लांबणीवर पडत आहे. स्थानिक उमेदवाराला प्राधान्य द्यायचे की, बाहेरच्या यावर एकमत होत नसल्यामुळे ही निवड रेंगाळली असल्याचे समजते.विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अंतिम पाच जणांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये नागपूरचे डॉ. प्रमोद येवले आणि औरंगाबादचे डॉ. के.व्ही. काळे यांच्यात चुरस असल्याचे चित्र पहिल्यापासून निर्माण झाली होती. औरंगाबाद येथील सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. काळे यांचे नाव लावून धरले होते. तशा पद्धतीचे संदेश मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याचवेळी राज्याचे सत्ताकेंद्र असलेल्या नागपुरातील डॉ. येवले यांनी जोर लावल्यामुळे ही निवड थांबली आहे. शनिवार व रविवार राज्यपाल दौºयावर होते. त्यामुळे निर्णय झाला नाही. सोमवारी निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, औरंगाबादच्या दौºयावर आलेले जालन्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनीही कार्यकर्त्यांशी बोलताना कुलगुरूंची निवड लांबण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे कुलगुरूंच्या निवडीमध्ये राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप सुरू असल्यामुळे निवड लांबणीवर गेली आहे. कुलगुरूंच्या निवडीची उत्सुकताही ताणल्यामुळे उच्च शिक्षण क्षेत्रात कोण होणार कुलगुरू? या चर्चेला उधाण आले आहे. डॉ. येवले व डॉ. काळे यांच्यासह नांदेड येथील डॉ. रघुनाथ होळंबे, कोल्हापूर येथील डॉ. विजय फुलारी, नाशिक येथील डॉ. धनंजय माने हे सुद्धा स्पर्धेत आहेत. यात आघाडीवर असलेल्या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात हितचिंतकांनी तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इतर नावांचाही विचार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.चौकट,विधि विद्यापीठाचे त्रांगडे सुटेनाऔरंगाबादेतील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवडही लांबली आहे. या विद्यापीठाला मागील सहा महिन्यांपासून पूर्णवेळ कुलगुरू नाही. या विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी शोध समितीने १४ जणांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. त्यापैकी चार नावांची शिफारस कुलपतींकडे केली. मात्र, अद्यापही कुलपतींनी निर्णय घेतलेला नाही. यामुळे औरंगाबादेतील दोन्ही विद्यापीठे कुलगुरूंच्या प्रतीक्षेत आहेत.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठ