शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला खंडपीठाचा दिलासा

By admin | Updated: October 9, 2014 00:50 IST

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या जमिनीवर मूळ मालकाने बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर कृउबाने खंडपीठात याचिका दाखल केली असता संपादित जमिनीवर बांधकाम करणार नाही,

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेल्या जमिनीवर मूळ मालकाने बांधकाम सुरू केले होते. त्यानंतर कृउबाने खंडपीठात याचिका दाखल केली असता संपादित जमिनीवर बांधकाम करणार नाही, अशी हमी मूळ मालकाने औरंगाबाद खंडपीठात दिल्याने कृउबाला दिलासा मिळाला आहे. याचिकेची सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर ठेवण्यात आली आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार करण्यासाठी शासनाने २१ एप्रिल १९८९ रोजी जाधववाडी येथील जळगाव रोडलगत असलेली ३ हेक्टर ५ गुंठे जमीन संपादित केली होती. त्याबाबतचा मावेजाही शासनाने घोषित केला होता. जमिनीचे मूळ मालक श्रीनिवास खटोड, प्रेमदास मंत्री यांना आपली जमीन शासनास देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी मावेजाही स्वीकारला नाही. जमीन संपादन करण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायलायात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने निर्णय देताना या प्रकरणी कलम ४८ नुसार महसूलमंत्र्यांकडे दाद मागण्याची मुभा त्यांना दिली होती.याचिकाकर्त्यांनी महसूलमंत्र्यांकडे अर्ज सादर करून आपली जमीन भूसंपादनातून वगळण्यात यावी, अशी विनंती केली होती. तेव्हा तत्कालीन महसूलमंत्र्यांनी या जमिनीचा ताबा घेण्यास स्थगिती दिली होती. दरम्यान, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच महसूलमंत्र्यांनी या अर्जावर निर्णय दिला. त्यांच्या निर्णयानुसार भूसंपादनाच्या नवीन कायद्यानुसार जमिनीचे संपादन करावे. हे आदेश प्राप्त होताच जमीन मालकाने सदरील जमिनीवर जळगाव रस्त्याच्या बाजूने पत्र्याचे कुंपण घातले. त्यानंतर ते बांधकाम करणार असल्याचे दिसताच कृउबाने अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून या बांधकामास मज्जाव करण्याची विनंती केली. ही याचिका सुनावणीसाठी आली असता जमीन मालकातर्फे त्या जागेवर बांधकाम करण्यात येणार नाही, अशी हमी देण्यात आली. याचिकेची सुनावणी दिवाळीच्या सुट्यांनंतर होईल. जमीन मालकाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. विनायक दीक्षित यांनी बाजू मांडली.