शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

सिंचन प्रकल्पांच्या निधी वाटपात गडबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 01:00 IST

सिंचन प्रकल्पांच्या निधी वाटपात गडबड असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे यांनी आज केला.

ठळक मुद्देआगामी दहा वर्षे : मराठवाड्याचे सिंचन ११.५० टक्क्यांनी घटणार

औरंगाबाद : सिंचन प्रकल्पांच्या निधी वाटपात गडबड असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट मराठवाडा विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य शंकरराव नागरे यांनी आज केला. या सगळ्या गडबडीमुळे मराठवाड्यात येत्या १० वर्षांत ११.५० टक्क्यांनी सिंचन अनुशेष वाढेल. त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्र आणि विदर्भ सिंचनात ४० टक्क्यांनी पुढे गेलेला असेल. याबाबत विभागातील राजकारण्यांनी वेळीच जागे व्हावे अन्यथा उशीर झाल्यास विभागाचे नुकसान झालेले असेल, असेही ते म्हणाले.

एन-२ ठाकरेनगर येथे ग्रामविकास संस्थेतर्फे आयोजित ‘मराठवाडा पाणी प्रश्न आणि उपाय’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. नागरे म्हणाले, निधी वाटपाचे सूत्र बदलणे गरजेचे आहे. ५१ टक्के निधी पश्चिम महाराष्ट्रात, २२ टक्के निधी मराठवाड्यात आणि २८ टक्के निधी विदर्भाकडे जातो आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या ७ टक्के सिंचन जास्त आहे. तरीही ५१ टक्के निधी त्या भागाकडे झुकतो आहे. ९० हजार कोटींचा खर्च आजवर सिंचनावर झालेला आहे. तरीही सिंचनाचा अनुशेष वाढतो आहे. ही बाब चिंताजनक आहे. सध्या तरतूद केलेली कामे संपल्यानंतर पुढे काय करणार असा प्रश्न आहे. गोदावरी पात्रात कोकण खोरे आणि कृष्णा खोऱ्यातील पाणी आणण्यासाठी प्रकल्पांची तरतूद करून ते मंजूर करावे लागतील, तरच मराठवाड्याला थोड्या-फार प्रमाणात लाभ होईल.

३५० सिंचन प्रकल्पांची कामेसध्या राज्यभरात ३५० सिंचन प्रकल्पांची कामे सुरू आहेत. १४९ प्रकल्प विदर्भात, १५० प्रकल्प उर्वरित महाराष्ट्रात आणि ५१ प्रकल्प मराठवाड्यात आहेत. ८४ हजार कोटींचा खर्च या कामांवर करण्याची तरतूद आहे. त्यातील १५ हजार कोटी रुपये मराठवाड्याच्या वाट्याला आले आहेत. एवढे होऊनही मराठवाडा २५ टक्के सिंचनात येईल. उर्वरित महाराष्ट्रात ४२ टक्के तर विदर्भात ३९ टक्के सिंचन झालेले असेल. ७५ टक्के जमीन या प्रकल्पांच्या कामानंतर तशीच राहील. त्यामुळे येणाºया १० वर्षांत मराठवाड्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नागरे यांनी वर्तविली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पState Governmentराज्य सरकार