शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलला गतवैभव प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:19 IST

वजिराबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून अखेरच्या घटिका मोजणाºया जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलचा पुनर्जन्म झाल्याने ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी राहिली आहे़ ही किमया शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांच्या अथक प्रयत्नातून साधली़

भारत दाढेल ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वजिराबाद परिसरातील मागील अनेक वर्षांपासून अखेरच्या घटिका मोजणाºया जिल्हा परिषद मल्टीपर्पज हायस्कूलचा पुनर्जन्म झाल्याने ही शाळा पुन्हा एकदा गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी राहिली आहे़ ही किमया शाळेचे मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांच्या अथक प्रयत्नातून साधली़निजामकालीन ही शाळा त्यावेळी मराठवाड्यात दुसºया क्रमांकाची होती़ शाळेचे बांधकाम १९०२ ते १९१० या काळात झाले आहे. माजी शिक्षण राज्यमंत्री कमलकिशोर कदम, माजी आमदार, स्वातंत्र्य सैनिक साहेबराव देशमुख बारडकर हे या शाळेचे विद्यार्थी. मध्यंतरी शाळेच्या वैभवाची घसरण सुरू झाली़ खासगी शाळा नावारूपाला आल्या, परंतु ही शाळा उपेक्षित राहिली. अलीकडे तर ही ऐतिहासिक वास्तू धर्मशाळा बनली होती़ शाळेला संरक्षक भिंत नसल्याने मैदानावर अतिक्रमण वाढले़ शाळेच्या परिसरात दारूच्या बाटल्या सापडू लागल्या़ मद्यपींची रात्रीची बैठक या ठिकाणी सुरू झाली होती़ शाळा सुधारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नव्हते़ या इमारतीचे वैभव हळूहळू नष्ट होऊ लागले़ त्यामुळे रम्य वाटणारी ही वास्तु भयाण वाटत होती़ शिक्षक बालासाहेब कच्छवे यांना पदोन्नती मिळून ते शाळेचे मुख्याध्यापक झाले. याच काळात अभिमन्यू काळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आले. काळे यांनी शाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्याध्यापक कच्छवे यांनी शाळेच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगितले. काळे यांनी मदतीचा हात दिला आणि कामाला सुरुवात झाली़ २ आॅक्टोबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या शंभर दिवसांत हा कायाकल्प प्रकल्प सिद्धीस गेला.जुनी ऐतिहासिक वास्तू जतन कशी करायची, यासाठी सुरेश जोंधळे यांचा सल्ला मिळाला. कमी वेळात जास्त काम करण्यासाठी जपानी कायझेन तंत्र वापरले. इमारतीचा रंग उडालेला. सागवानी दरवाजे, खिडक्या, कपाटे, फर्निचर सगळं जुनाट. त्यांना पॉलिश करायचे ठरले़ कारागिरांच्या राहण्याची व्यवस्था कामावरच करण्यात आली़ त्यामुळे त्यांनी ३९ दिवसांत काम पूर्ण केले़शाळेची संरक्षक भिंत बांधून घेतली. साचलेल्या दारूच्या बाटल्यांच्या काचा भिंतीवर लावल्या. त्यामुळे शाळा सुरक्षित झाली. बाग कामामुळे वास्तूला शोभा आली़ सीसीटीव्ही कॅमेºयामुळे प्रत्येक वर्गात काय चालू आहे हे मुख्याध्यापक कार्यालयात बसून बघू- ऐकू लागले़ निजामकाळापासून इथे हवामानाच्या नोंदी घेणारी यंत्रणा आहे. जलमापिका, आर्द्रतामापिका, वायूवेगमापिका, वायूदाबमापक, दिशादर्शक कुकुट यंत्र यावर रोज नोंदी होतात.नवे रूप परिधान करून शाळेची वास्तू आज दिमाखात उभी आहे़