- रऊफ शेखफुलंब्री : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज, शुक्रवारी ( दि. १३ ) सकाळी पावणे दहा वाजेला अचानक फुलंब्री तहसील कार्यालयात पोहचले. हजेरी रजिस्टर ताब्यात घेऊन तपासणी केली असता तहसील कार्यालयातील १६ पैकी फक्त ३ कर्मचारी वेळेवर हजर असल्याचे आढळून आले. तर पंचायत समितीच्या ४५ कर्मचाऱ्या पैकी केवळ दहाच कर्मचारी वेळेवर पोहचले असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांच्या निदर्शनास आले. उशिरा येणाऱ्या व गैरहजर कर्मचारी, अधिकारी यांच्यावर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
तालुका स्तरावरील शासकीय कार्यालयात कर्मचारी कधी येतात? नागरिक कामासाठी कधी येतात ? याची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शुक्रवारी फुलंब्री येथे गोपनीय दौरा केला. सकाळी पावणे दहा वाजता ते प्रशासकीय इमारतीत पोहचले. या इमारतीमध्ये तहसीलसह भूमिअभिलेख, दारूबंदी, कृषी कार्यालय, पुरवठा विभाग, कोषागार, सहकार विभाग असे सात विविध विभागाचे कार्यालय आहेत. जिल्हाधिकारी स्वामी यांनी रथम इमारतीचे दरवाजे बंद केले. मुख्य दरवाजासमोरच जिल्हाधिकारी खुर्ची टाकून अधिकारी, कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसले.
जिल्हाधिकारी दारात, कर्मचाऱ्यांची धांदलदरम्यान, बाहेर बसूनच जिल्हाधिकारी स्वामी यांनी हजेरी रजिस्टरची पाहणी केली. यावेळी केवळ नायब तहसीलदार संजीव राऊतसह केवळ दोनच कर्मचारी वेळेवर उपस्थित होते. वेळेनंतर एक एक कर्मचारी येत होते. त्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी उशिरा येण्याचे कारण विचारले असता कोणालाही उत्तर देता आले नाही. तहसील कार्यालयातील १६ पैकी ३ कर्मचारी दहाच्या आत पोहचले. तर पंचायत समितीमधील ४५ पैकी केवळ १० कर्मचारी वेळेवर आले होते. हजेरी पत्रकाची झेरोक्स प्रत जिल्हाधिकारी स्वामी सोबत घेऊन गेले.
नियमित पाहणी करणारशासकीय कार्यालय येणारे नागरिक व कर्मचारी अधिकारी यांनी पावणे दहा पर्यंत येणे आवश्यक आहे. पावणे दहा वाजता केवळ ३ कर्मचारी आले होते हे योग्य नाही. उशिरा आलेल्या गैरहजर असलेल्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा एकदिवसाचा पगार कपात केला जाईल. त्यांच्या सर्व्हिस बुकमध्ये नोंद केली जाईल. यानंतरही सुधारणा झाली नाही तर निलंबनाची कारवाई केली जाईल. तसेच यापुढेही अशी पाहणी करण्यात येईल- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी