शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

By विजय सरवदे | Updated: March 14, 2024 15:48 IST

आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील अवघ्या ५ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अनाथ प्रमाणपत्रासाठी प्राप्त प्रस्तावानुसार बालकल्याण समिती तसेच बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतरच ही प्रमाणपत्रे देण्यात आली. 

तथापि, अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे वितरित करण्याचे काम निरंतरपणे सुरू असून आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ अनाथ तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदानाचा लाभ मिळत नाही. परिणामी, प्रमाणपत्राअभावी त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने बालगृहात दाखल अथवा नातेवाईक सांभाळ करीत असलेल्या व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. यासाठी महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी या विभागाच्या जिल्हा कार्यालयात समर्पित कक्षही स्थापन केला होता.

या मोहिमेद्वारे बालकांना केवळ अनाथ प्रमाणपत्रच नव्हे, तर आधार कार्ड, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड अशी अनेक प्रमाणपत्र देण्याचे नियोजन होते. या मोहिमेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली. सध्या ५ बालकांना दाखले देण्यात आले असले, तरी अनेक बालकांचे विविध दाखल्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे निर्णयास्तव प्रलंबित आहेत.

संस्थाबाह्य प्रस्ताव निकालीयासंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले की, या पंधरवड्यात संस्थाबाह्य आलेल्या प्रस्तावातील ५ बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घरभेटी देऊन सत्यता पडताळल्यानंतरच अनाथ प्रमाणपत्रे दिली जातात. जिल्ह्यात निरंतरपणे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू असते. आतापर्यंत जिल्ह्यातील १७० अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक