शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पंधरवड्यात फक्त पाच बालकांना अनाथ प्रमाणपत्रांचे वितरण

By विजय सरवदे | Updated: March 14, 2024 15:48 IST

आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे जिल्ह्यातील अवघ्या ५ बालकांना अनाथ प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. अनाथ प्रमाणपत्रासाठी प्राप्त प्रस्तावानुसार बालकल्याण समिती तसेच बालसंरक्षण कक्षातील अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतरच ही प्रमाणपत्रे देण्यात आली. 

तथापि, अनाथ बालकांना आवश्यक कागदपत्रे वितरित करण्याचे काम निरंतरपणे सुरू असून आतापर्यंत पावणेदोनशे बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ अनाथ तसेच जातीचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदानाचा लाभ मिळत नाही. परिणामी, प्रमाणपत्राअभावी त्यांच्या भावी आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महिला व बाल विकास विभागाने बालगृहात दाखल अथवा नातेवाईक सांभाळ करीत असलेल्या व निकष पूर्ण करणाऱ्या बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात येते. यासाठी महिला व बाल विकास विभागाने २३ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी या विभागाच्या जिल्हा कार्यालयात समर्पित कक्षही स्थापन केला होता.

या मोहिमेद्वारे बालकांना केवळ अनाथ प्रमाणपत्रच नव्हे, तर आधार कार्ड, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदान कार्ड, रेशन कार्ड अशी अनेक प्रमाणपत्र देण्याचे नियोजन होते. या मोहिमेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी समन्वय साधून अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करण्यात आली. सध्या ५ बालकांना दाखले देण्यात आले असले, तरी अनेक बालकांचे विविध दाखल्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालयाकडे निर्णयास्तव प्रलंबित आहेत.

संस्थाबाह्य प्रस्ताव निकालीयासंदर्भात महिला व बाल विकास विभागाच्या प्रभारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुवर्णा जाधव यांनी सांगितले की, या पंधरवड्यात संस्थाबाह्य आलेल्या प्रस्तावातील ५ बालकांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घरभेटी देऊन सत्यता पडताळल्यानंतरच अनाथ प्रमाणपत्रे दिली जातात. जिल्ह्यात निरंतरपणे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू असते. आतापर्यंत जिल्ह्यातील १७० अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादsocial workerसमाजसेवक