शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

हास्ताक्षर बदललेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण, शिक्षण मंडळाचा निर्णय

By राम शिनगारे | Updated: June 23, 2023 21:57 IST

ग्रामीण पोलिसांचा शिक्षक आरोपींचा शोध सुरूच

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मंडळाने या विद्यार्थ्यांनी जेवढी उत्तरे लिहिली होती. त्या उत्तरानुसार निकाल जाहीर करीत गुणपत्रिकांचे वितरण थांबविण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अद्याप आरोपी शिक्षक सापडले नाहीत. त्यातच संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने ३७२ गुणपत्रिकांचे वाटप केल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली.

शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा तपासणीचा प्रवास केंद्रप्रमुख, कस्टोडियन, मॉडरेटर, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ते शिक्षक असा होता. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने परत मंडळात येतात. यावर्षी बारावीच्या परीक्षेला १ लाख ७५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. बीड, अंंबाजोगाई, कान्होळा, पैठण या ठिकाणच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घनवट आणि पिंपळा येथील शिक्षक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांच्याकडे पाठविल्या होत्या. १३ मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासून जमा करणे अपेक्षित असतांना वारंवार मंडळाने सांगूनही ८ एप्रिल रोजी त्या जमा करण्यात आल्या. तेव्हा मॉडरेटरने तपासणी केल्यानंतर त्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिक्षकांवर फर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात मंडळाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांची तपासणी करून त्यांचा निकाल जाहीर केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नव्हत्या. त्या गुणपत्रिका मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण मंडळाने केले हात वरमंडळाने गुणपत्रिका संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविलेल्या नव्हत्या. त्यामुळे महाविद्यालयांनी त्याचे वितरण विद्यार्थ्यांना केले नव्हते. मात्र निकालास २४ दिवस उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील निकाल रखडल्यामुळे मंडळाचे गुणपत्रिका महाविद्यालयात पाठवून दिल्या. त्याचे वाटप मागील दोन दिवसात झाले आहे. याविषयी मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना विचारले असता, त्यांनी मंडळाकडे गुणपत्रिकाच नव्हत्या. निकाल लागला तेव्हाच सर्वासोबतच त्या गुणपत्रिका संबंधितांच्या शाळांमध्ये पाठविल्याचे सांगितले. त्यामुळे या गुणपत्रिका नेमक्या कुणी आणि कुठे आडवून ठेवल्या होत्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा