शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हास्ताक्षर बदललेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वितरण, शिक्षण मंडळाचा निर्णय

By राम शिनगारे | Updated: June 23, 2023 21:57 IST

ग्रामीण पोलिसांचा शिक्षक आरोपींचा शोध सुरूच

छत्रपती संभाजीनगर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेला बसलेल्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मंडळाने या विद्यार्थ्यांनी जेवढी उत्तरे लिहिली होती. त्या उत्तरानुसार निकाल जाहीर करीत गुणपत्रिकांचे वितरण थांबविण्यात आले होते. मात्र, पोलिसांना अद्याप आरोपी शिक्षक सापडले नाहीत. त्यातच संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मंडळाने ३७२ गुणपत्रिकांचे वाटप केल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या सूत्रांनी दिली.

शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेतील उत्तरपत्रिकांचा तपासणीचा प्रवास केंद्रप्रमुख, कस्टोडियन, मॉडरेटर, मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ते शिक्षक असा होता. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर पुन्हा त्याच पद्धतीने परत मंडळात येतात. यावर्षी बारावीच्या परीक्षेला १ लाख ७५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. बीड, अंंबाजोगाई, कान्होळा, पैठण या ठिकाणच्या भौतिकशास्त्र विषयाच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घनवट आणि पिंपळा येथील शिक्षक राहुल भंगवान ऊसारे आणि मनिषा भागवत शिंदे यांच्याकडे पाठविल्या होत्या. १३ मार्च रोजी उत्तरपत्रिका तपासून जमा करणे अपेक्षित असतांना वारंवार मंडळाने सांगूनही ८ एप्रिल रोजी त्या जमा करण्यात आल्या. तेव्हा मॉडरेटरने तपासणी केल्यानंतर त्या उत्तरपत्रिकांमध्ये हस्ताक्षर बदलल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर शिक्षकांवर फर्दापुर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात मंडळाने विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तरांची तपासणी करून त्यांचा निकाल जाहीर केला होता. मात्र, विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नव्हत्या. त्या गुणपत्रिका मागील दोन दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण मंडळाने केले हात वरमंडळाने गुणपत्रिका संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविलेल्या नव्हत्या. त्यामुळे महाविद्यालयांनी त्याचे वितरण विद्यार्थ्यांना केले नव्हते. मात्र निकालास २४ दिवस उलटून गेले आहेत. विद्यार्थ्यांचे पुढील वर्षातील निकाल रखडल्यामुळे मंडळाचे गुणपत्रिका महाविद्यालयात पाठवून दिल्या. त्याचे वाटप मागील दोन दिवसात झाले आहे. याविषयी मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांना विचारले असता, त्यांनी मंडळाकडे गुणपत्रिकाच नव्हत्या. निकाल लागला तेव्हाच सर्वासोबतच त्या गुणपत्रिका संबंधितांच्या शाळांमध्ये पाठविल्याचे सांगितले. त्यामुळे या गुणपत्रिका नेमक्या कुणी आणि कुठे आडवून ठेवल्या होत्या, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षा