शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

औरंगाबादेत सात महिन्यांत ३.३३ लाख शिवभोजन थाळ्यांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 14:03 IST

ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देदररोज १८ केंद्रांवर ३ हजार थाळ्या वाटप लाभधारकांनी पोळी, भाजी वाढविण्याची केली मागणी 

औरंगाबाद : जानेवारी महिन्यात सुरू झालेली शिवभोजन योजना लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आधार ठरली. शहरात चारच केंद्रांत सुरू झालेली ही योजना आता जिल्ह्यात १८ ठिकाणांहून पाच रुपयांत शिवभोजन थाळी  देत आहे. जुलैअखेर ३ लाख ३२ हजार ३१३ थाळ्यांचे वाटप करण्यात आले. केंद्रांना ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वाटप झाले नाही तर मोफत वाटप करून कोटा पूर्ण केला जात असल्याचे गुरुवारी दिसून आले. लाभधारकांनी जेवण चांगले मिळत असल्याचे प्रशस्तीपत्र देतानाच भाजीपोळी वाढवण्याची गरज व्यक्त केली.

लोकमत प्रतिनिधीने  बसस्थानक, टीव्ही सेंटर, घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रांना भेटी देऊन परिस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यात एकूण १८ केंद्र आहेत. त्यापैकी सहा केंद्र शहरात असून १२ केंद्र ग्रामीण भागात आहेत. त्यांना एकूण ३ हजार थाळ्या वाटपाची परवानगी मिळालेली आहे. कोरोनामुळे थाळीऐवजी पॅकिंग फूड दिले जाते. थाळीमध्ये २ चपात्या, १ वाटी भाजी, १ वाटी वरण व भात देण्यात येत असल्याचे घाटीतील केंद्रचालक राजू भैरव यांनी सांगितले. तर लॉकडाऊन काळातही ठरवून दिलेल्या थाळ्यांचे वितरण रोज पूर्ण केल्याचे बसस्थानक येथील केंद्रचालक उपिंदर मल्होत्रा म्हणाले.

१७ केंद्रांतून २३४५ पाकिटांचे वाटपया योजनेतून थाळीचा लाभ घेण्यासाठी अ‍ॅपद्वारे नोंदणी करण्यात येते. त्याची आकडेवारी थेट अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वितरण प्रणालीवर कळते. गुरुवारी दुपारी ३.३० वाजेपर्यंत २३४५ थाळ्यांचे वाटप झालेले होते, तर १८ पैकी शहरातील शिवाजीनगर येथील केंद्रावर एकही थाळी वाटप करण्यात आलेली नव्हती. केंद्रचालकांना मंजूर थाळ्यांचे अन्न पाकीट तयार होते. ठरवून दिलेल्या वेळेत ही पाकिटे वाटप न झाल्यास मोफतही वाटप करण्यात आल्याचे दिसून आले.

 

शिवभोजन थाळ्यांच्या वाटपाची आकडेवारी

महिना :     थाळ्यांचे वाटपजानेवारी :     २,७९०फेब्रुवारी :     १४,६२९मार्च :     १९,८९३एप्रिल :     ६७,०१७मे :     ७०,९८८जून :     ७८,४९४जुलै :     ७८,५०२एकूण :     ३,३२,३१३ 

नातेवाईक नव्हते तरी अडचण आली नाहीगेल्या आठ दिवसांपासून घाटीत पत्नी भरती आहे. इथे कोणी नातेवाईक नाही; परंतु शिवभोजनामुळे इथे जेवणाची अडचण आली नाही. वरण-भातासोबत रोज वेगळी भाजी असते.- गंगाधर दुतोंडे, भोकरदन

पैसे नसले तरी मोफत भोजनमला कोणीच नसल्याने मी दोन महिन्यांपासून घाटीच्या नातेवाईकांच्या निवाऱ्यात राहते. माझ्याकडे पैसे नाहीत; परंतु मोफत शिवभोजन मिळते. चांगले व पोटभर जेवण होते. -शेख नसीम, बीड

भाजी व पोळी वाढविली पाहिजेबसस्थानकाजवळ एका इमारतीवर काम करतो. दुपारचे जेवण मी बसस्थानकातील शिवभोजन केंद्रावरून पाकीट घेऊन करतो. पोळी आणि भाजी वाढवून दिली पाहिजे; पण किंमत वाढवू नये.- सुरेश जाधव, सिडको 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न