शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयीन प्राध्यापक भरतीवरील अनिश्चिततेचे सावट दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:08 IST

याचिकेमुळे निर्माण झालेला संभ्रम शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्दे यूजीसीच्या पत्राचा संभ्रम संपला शिक्षणमंत्र्यांनी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत निर्देश

औरंगाबाद : महाविद्यालयातीलप्राध्यापकांच्या भरतीसंदर्भात असलेले अनिश्चिततेचे सावट दूर झाले आहे. यूजीसीच्या बिंदुनामावलीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेमुळे निर्माण झालेला संभ्रम शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दूर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोमवारी राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलसचिव, उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक, संचालक, सचिव, विधि विभागाचे सचिव यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत महाविद्यालातील प्राध्यापक भरतीसंदर्भातील आढावा घेण्यात आला. यावेळी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी प्राध्यापक भरतीसंदर्भात येत असलेल्या अडचणींचा पाढाचा यावेळी वाचला. विद्यापीठ अनुदान आयोग, मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार यांनी शिक्षकीय संवर्गातील आरक्षण बिंदुनामावलीबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. ही याचिका निकाली निघेपर्यंत विद्यापीठांमधील प्राध्यापक भरती स्थगित करण्याचे आदेश यूजीसी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने १८ जुलै २०१७ रोजी काढले होते.

यामुळे शासनाने महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवर असलेली बंदी उठवत एकूण रिक्त पदांच्या ४० टक्के जागा भरण्यास मंजुरी दिली. तरीही भरती प्रक्रिया पुढे सरकत नव्हती. विद्यापीठांमधील आरक्षण विभागाने यूजीसीच्या पत्राचा हवाला देत बिंदुनामावली तपासून देण्यासंदर्भात पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्याची भूमिका घेतली होती. याविषयी मंत्रालयातील बैठकीत चर्चा करण्यात आली. विधि व न्याय विभागाच्या सचिवांनी यूजीसीचे पत्र हे विद्यापीठांना लागू असून, महाविद्यालयांना लागू नसल्याचे स्पष्ट केले. यामुळे महाविद्यालयातील भरतीसंदर्भात असलेले अडथळे दूर झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फेब्रुवारीअखेरपर्यंत नेमणुका मिळाव्यातविद्यापीठातील आरक्षण विभागाने महाविद्यालयातील रिक्त पदांसंदर्भातील बिंदुनामावली २० जानेवारीपर्यंत तपासून द्यावी, त्यानंतर विभागीय आयुक्तालयातील मागसवर्ग कक्षाने पुढील तीन दिवसांत मंजुरी द्यावी, तेथून विभागीय संचालक आणि संचालक स्तरावर आठ दिवसांत कार्यवाही करावी, असे आदेशही शिक्षणमंत्र्यांनी दिल्याचे समजते. ४फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रिक्त पदांच्या जाहिराती आल्या पाहिजेत. तेथून १५ दिवस अर्ज मागविणे आहे. पुढील पंधरा दिवसांत मुलाखती आणि नेमणुकांच्या ऑर्डर पात्रताधारकांना मिळाल्या पाहिजेत, असे नियोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी नोकरभरती पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकारProfessorप्राध्यापक