शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाविकास आघाडीत वॉर्डांवरून कुरबुर; राज्य पातळीवर एकी, ‘ग्राऊंड रिॲलिटी’ वेगळीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 19:43 IST

राष्ट्रवादीच्या वॉर्डातून ‘पूर्व’मध्ये मुसंडी मारण्याचे शिवसेनेचे प्रयत्न

- धनंजय लांबे

औरंगाबाद : भिन्न विचारांच्या तीन पक्षांचे, राज्यात गुण्यागोविंदाने नांदताना दिसत असलेले सरकार आपल्या कारकिर्दीची दोन वर्षे पूर्ण करीत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकाही एकत्र लढविण्याच्या गमजा राज्य पातळीवरील नेते मारत असले तरी, ‘ग्राऊंड रिॲलिटी’ काही औरच आहे. वॉर्ड आणि प्रभाग पातळीवर आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांमध्ये कमालीचे मतभेद आहेत आणि ते या निवडणुकांमध्ये या पक्षांमधील बेदिली दाखवून देणार आहेत.

औरंगाबादेत महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. नगरविकासमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एका वॉर्डातील रस्तेकामाचा शुभारंभ केला. अधिकृतपणे एका आमदाराच्या मतदारसंघातील हा कार्यक्रम होता; परंतु तो महापालिकेच्या ज्या वॉर्डात घेण्यात आला, त्या बाळकृष्णनगर-विजयनगर वॉर्डाचे प्रतिनिधित्व मावळत्या पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्योती मोरे करीत आहेत. शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ या वॉर्डातून निवडणूक लढवू इच्छितात आणि ज्याअर्थी मंत्र्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली, त्याअर्थी त्यांचीही हीच इच्छा दिसते. राष्ट्रवादीकडे लोकांमधून निवडून आलेला एकही आमदार शहरात नसल्यामुळे या प्रकरणात फारसा विरोध होणार नाही, याची कल्पना असल्यामुळेच शिवसेनेच्या आमदार-मंत्र्यांनी हा वॉर्ड ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्य पातळीवर आघाडीतील एकीला तडा जाऊ नये म्हणून या स्थानिक राजकारणाचा फारसा गवगवा केला जाणार नाही, हे गृहीत धरून शिवसेनेने राष्ट्रवादीच्या वॉर्डात घुसखोरी केली आहे. तथापि, राष्ट्रवादीच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाने मनावर घेतले, तर आघाडीतील विसंवादाची पहिली ठिणगी या वॉर्डाच्या निमित्ताने पडू शकेल. पूर्व मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे माजी मंत्री अतुल सावे करत आहेत. त्यांच्या किल्ल्यात मुसंडी मारण्याचे निमित्त, राष्ट्रवादीच्या वॉर्डाच्या माध्यमातून चालविण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचा प्रभाव आहे आणि या भागात आपल्या वॉर्डांची संख्या वाढली तर आमदारही निवडून आणता येईल, अशी शिवसेनेची रणनीती आहे. सध्यातरी राष्ट्रवादीने शिवसेनेचा दबाव मान्य केल्याचे चित्र आहे.

कुरघोडीची संधीऔरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा प्रभाव असल्यामुळे मराठवाड्यातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचीही जिल्ह्यावर मेहेरनजर नाही. परिणामी रस्ते, पाणीपुरवठा व इतर सुविधांसाठी निधीचा पुरवठादेखील वेळेवर होत नाही. या पक्षांनी नेमलेले संपर्क नेतेदेखील औरंगाबादकडे फिरकत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेनेला या दोन्ही पक्षांवर कुरघोडी करण्याची संधी मिळाली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक