शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शहराध्यक्ष नियुक्तीवरून भाजपमधील बेबनाव समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:32 IST

निवड झाल्याच्या चर्चेने सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव

ठळक मुद्देबोराळकरांना ‘चकवा’ भाजपचे वरिष्ठ नेते मात्र अनभिज्ञ

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि ग्रामीण अध्यक्षपदावरून पक्षात बराच बेबनाव असल्याचे सोमवारी समोर आले. औरंगाबाद शहर आणि  ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अनुक्रमे शिरीष बोराळकर आणि विजय औताडे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त सोमवारी दुपारीच सोशल मीडियात झळकले. मात्र सायंकाळी बोराळकर यांना पुन्हा एकदा शहराध्यक्षपदाला ‘चकवा’ मिळाल्याची चर्चा सुरू झाली. 

औरंगाबाद भाजपच्या शहराध्यक्षपदी बोराळकर आणि ग्रामीणच्या अध्यक्षपदी औताडे यांची नियुक्ती झाल्याचे वृत्त दुपारी आले होते. भाजपच्या शहरातील वरिष्ठांनी यास दुजोराही दिला होता. मात्र मुंबई भाजपच्या प्रदेश कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात शिरीष बोराळकर यांचा समावेश पक्षाच्या प्रवक्तेपदात होता. तर विजय औताडे यांचे नावही नव्हते. मागील तीन दिवसांपासून बोराळकर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सुरू होती.  प्रदेशाध्यक्ष पाटील हे संघाच्या बैठकीसाठी शनिवारी शहरात आले होते. तेव्हा त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त होते. मात्र नियुक्तीच्या काही वेळापूर्वी महत्त्वाच्या घडामोडी घडल्याचे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी औरंगाबादचे शहराध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड थांबविण्यात आल्याचे समजते. यात वरिष्ठ पातळीवरील नेत्यांचा समावेश असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली.

भाजप प्रदेश कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात बोराळकर यांना प्रदेश प्रवक्तापदी कायम ठेवण्यात आले आहे. याविषयी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांच्याश्ी संपर्क साधला असता, त्यांनी सुरुवातीला बोराळकर आणि औताडे यांची नियुक्ती झाल्याचे सांगितले. मात्र प्रदेश कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही नावे नसल्याचे लक्षात आणून दिले असता त्यांनी  माहिती घेतो, असे स्पष्ट केले. थोड्या वेळानंतर डॉ. कराड यांनीच औरंगाबाद शहर भाजपात कोणताही बदल झालेला नसल्याची माहिती दिली. यावरून वरिष्ठ नेत्यांमध्येच बेबनाव असल्याचे समोर आले आहे.

संजय केणेकर यांना केले संघटनेतून पदमुक्तप्रदेश भाजप कार्यालयाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात कामगार आघाडीचे संयोजक संजय केणेकर यांना पदमुक्त करण्यात आले आहे. अन्य जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक कारणामुळे पदमुक्त केल्याचे स्पष्टीकरण भाजपतर्फे देण्यात आले आहे.

टॅग्स :BJPभाजपाAurangabadऔरंगाबादvidhan sabhaविधानसभा