शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोंधळात उरकले उड्डाणपुलाचे नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 01:22 IST

सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिडको येथे वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपुलास मनपाने स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा कार्यक्रम रविवारी सकाळी आयोजित केला. या कार्यक्रमास विरोध करीत राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.दोन वर्षांपूर्वी सिडकोतील उड्डाणपुलास वि.दा. सावरकर यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेने घेतला होता. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेने सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास या पुलाचा नामकरण सोहळा आयोजित केला होता. तत्पूर्वीच राष्ट्रीय बंजारा परिषदेचे कार्यकर्ते सिडको उड्डाणपुलाच्या ठिकाणी जमा झाले व या पुलास वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, अशी घोषणाबाजी त्यांनी सुरू केली. तेव्हा महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट यांनी बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर मग उड्डाणपुलाचा नामकरण सोहळा पार पडला.यावेळी खा. चंद्रकांत खैरे, उपमहापौर विजय औताडे, किसनचंद तनवाणी, विकास जैन, सभापती गजानन बारवाल, देवजीभाई पटेल, दयाराम बसैये, आनंद तांदुळवाडीकर, अनिल पैठणकर, भाऊ सुरडकर, भाऊसाहेब जगताप आदींच्याप्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहारअर्पण करून अभिवादन करण्यात आले.आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्नराष्ट्रीय बंजारा परिषदेचे डॉ. कृष्णा राठोड, रविकांत राठोड, दत्ताभाऊ राठोड, विकास जाधव, रविराज राठोड, सुनील चव्हाण या कार्यकर्त्यांनी या उड्डाणपुलास वसंतराव नाईक यांचेच नाव द्यावे, अशी मागणी लावून धरली. मात्र, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पोलिसांच्या साहाय्याने आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.पुलाला वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी यावेळी गोरसेनेच्या वतीने डॉ. जीवन चव्हाण, मधुकर पवार, योगिराज राठोड, डॉ. विलास राठोड, विशाल राठोड, राजू चव्हाण, मिथुन पवार, दिगंबर राठोड या पदाधिका-यांनी निदर्शने केली.भावना दुखाविण्याचाप्रश्नच नाहीनामकरण सोहळ्याप्रसंगी खा. खैरे म्हणाले की, वसंतराव नाईक यांच्याविषयी आम्हालाही आदर आहे. महापालिकेने सावरकर यांचे नाव उड्डाणपुलाला देण्याबाबतचा ठराव घेतला होता. त्यामुळे कोणाच्या भावना दुखाविण्याचा प्रश्नच नाही. याचवेळी महापालिकेच्या पदाधिकाºयांनी मात्र, या पुलावर दोन्ही महापुरुषांची नावे कोरण्याचा अफलातून तोडगा काढला.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरVasantrao Naikवसंतराव नाईक