शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या धनंजय मुंडेंना बडतर्फ करा: अंबादास दानवे

By बापू सोळुंके | Updated: February 4, 2025 18:47 IST

मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे.

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांसाठी नॅनो डीएपी, नॅनो युरीया आणि फवारणी पंप खरेदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. हा प्रकार म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारखा आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत भ्रष्ट मुंडेंना बडतर्फ करावे, मंत्र्यापासून ते सचिवापर्यंत सर्वांवर गुन्हे नोंदवावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.

आ. दानवे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषदेत   पुराव्यानिशी धंनजय मुंडे यांनी नॅनो डिएपी, नॅनो युरीया तसेच फवारणी पंप खरेदीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कृषी विभागाच्या तत्कालीन सचिवांनी डीबीटी बाहेर खरेदी करण्याची प्रक्रिया राबववून सरकारची आणि शासनाची फसवणूक केली आहे. यामुळे याप्रकरणात मंत्र्यापासून ते सचिवांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल केले जावे,अशी आपली मागणी असल्याचे आ. दानवे म्हणाले. मुंडेंचे एकानंतर एक भ्रष्टाचाराचे प्रकरणे समोर येत आहे, असे असताना हे सरकार भ्रष्टाचाराला, गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारे आहे. लाडक्या बहिणींचे कुंकू पूसणारे सरकार असल्याचा आरोप आ.दानवे यांनी केला. यामुळे सरकारने तातडीन मुंडेचा राजीनामा घ्यावा,अन्यथा आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही आ. दानवे यांनी दिला.

मुंडे, कराड एकाच नाण्याच्या दोन बाजूसंतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात धनंजय मुंडेंवर खूनाचा गुन्हा नोंदविण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे, याकडे लक्ष वेधले असता आ. दानवे म्हणाले की, जरांगे यांची भूमिका योग्यच आहे. मुंडेच्या पाठिंब्यानेच कराड टोळीची मस्ती,दादागिरी बीडमध्ये वाढली आहे. कारण वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही एकाच न्यायाच्या दोन बाजू आहेत. पीक विमा घोटाळा, संतोष देशमुख हत्या आणि खंडणीचा प्रकार हा कोणाच्या आर्शिवार्दाशिवाय होऊच शकत नाही. कराड शिवाय मुंडेचे पानही हालत नाही.

टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेDhananjay Mundeधनंजय मुंडेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर