शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

डेंग्यूसदृश आजारांचा जिल्ह्याला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:18 IST

जिल्ह्याला आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजारांनी विळखा घातला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्याला आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश आजारांनी विळखा घातला आहे. जिल्ह्यामध्ये महिनाभरात ६३ संशयित रुग्ण आढळले. यामध्ये तिघांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाºयांची संख्या लक्षात घेता संशयित रुग्णांचा आकडा वाढू शकतो; परंतु आरोग्य यंत्रणा परिस्थिती चिंताजनक नसल्याचाच दावा करीत आहे.मुकुंदवाडी परिसरातील राजीव गांधीनगरातील १२ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा डेंग्यूसदृश आजाराने गुरुवारी रात्री मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. जानेवारीपासून जुलै महिन्यापर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे एकूण ६ रुग्ण समोर आले होते. यामध्ये २ ग्रामीण तर ४ शहरातील होते. सात महिन्यांच्या कालावधीत ६ रुग्ण आढळले; परंतु आॅगस्ट महिन्यात डेंग्यूसदृश रुग्णांमध्ये वाढ झाली.आॅगस्टमध्ये पडलेल्या पावासामुळे ठिकठिकाणी पाणी साचून डास उत्पत्तीला हातभार लागला. त्यामुळे अनेकांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली.जिल्ह्यातील ६३ संशयित रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतील ३२ रुग्णांचा समावेश आहे. यात ग्रामीण भागात एक तर शहरात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. हे तिन्ही रुग्ण आॅगस्टमधील आहेत. डेंग्यूसदृश आजाराने कोणाचा मृत्यू झाला, याची माहिती प्राप्त झालेली नाही, असे जिल्हा हिवताप अधिकारी अनिल पाटील म्हणाले.पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर देण्यात आला. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले, तरीही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले.