शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

जिल्हा परिषदेत बदल्यांची चर्चा सुरू

By admin | Updated: May 7, 2014 00:37 IST

औरंगाबाद : मे महिना उजाडला, की जिल्हा परिषदेत बदल्यांचा बाजार गरम होतो. यंदा दि. १६ मेपर्यंत आचारसंहिता असून बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे.

औरंगाबाद : मे महिना उजाडला, की जिल्हा परिषदेत बदल्यांचा बाजार गरम होतो. यंदा दि. १६ मेपर्यंत आचारसंहिता असून बदल्यांची चर्चा सुरू झाली आहे. तालुक्यांतर्गत प्रशासकीय बदल्यांतून शिक्षकांना वगळावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघाने ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर १२ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. त्यामुळे बदल्यांची सर्वाधिक चर्चा व गडबड गोंधळही येथे होतो. विशेषत: शिक्षकांच्या बदल्या अधिक प्रमाणात गाजतात. यावर्षीही शिक्षक संघटनांनी बदल्यांची चर्चा घडवून आणणे सुरू केले आहे. प्राथमिक शिक्षक संघाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, संघाचे नेते संभाजी थोरात, राज्याध्यक्ष राजाराम वरूटे, एस. टी. पाटील, बाळकृष्ण तांबारे यांनी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांची रविवारी भेट घेतली. शिक्षकांच्या तालुक्यांतर्गत प्रशासकीय बदल्या करू नयेत, यासाठी आग्रह धरला. संघाच्या या मागणीला ग्रामविकासमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याचा दावाही या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे. याशिवाय विनाअट तालुक्याबाहेर आपसात बदली करावी, जेणे करून मागच्या वर्षी प्रशासकीय बदल्यांत गैरसोय झालेल्या शिक्षकांना पुन्हा त्यांच्या तालुक्यात येणे सोपे होईल, विनंती बदलीसाठी ३ वर्षांची अट असावी, महिला शिक्षकांना बदल्यांमध्ये सवलत द्यावी आदी मागण्याही यावेळी करण्यात आल्या. संघाचे औरंगाबाद तालुकाध्यक्ष रमेश जाधव, प्रवीण पांडे, राजेश पवार आदींनी हे पत्रक प्रसिद्घीस दिले आहे. (लोकमत ब्युरो)