शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:59 IST

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष

ठळक मुद्देसप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झालाया पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे.विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता

पैठण : जायकवाडी धरणातून गेल्या ४९ दिवसापासून विसर्ग करण्यात येत असून या कालावधीत धरणातून आणखी एक धरण भरेल ईतके पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या ईतिहासात २००६ ला सर्वाधिक १०२ टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यानंतर यंदा आजच्या तारखेपर्यंत ७८ टिएमसी पाणी सोडण्यात आले असून अद्याप धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष असून यंदा जायकवाडी धरणा बाबत प्रचलित  नोंदी सोडून आगळ्या वेगळ्या नोंदी झाल्या आहेत. सप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून सतत ४९ दिवस पाणी सोडण्याचा यंदा विक्रम झाला आहे. या पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यंदा धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असून विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता धरण अभियंता संदिप राठोड यांनी  केली आहे. दरवर्षी नाशिक-नगरच्या पाण्यावर अवलंबून असलेले धरण यंदा आत्मनिर्भर झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाल्याने दोन वेळेस धरण भरेल ईतके पाणी जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातून दाखल झाले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून यंदा १० टिएमसी पाणी दाखल झाल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

यंदा ४९ दिवसात ७८ टिएमसी विसर्ग......जायकवाडी धरणातून विसर्ग सध्याही सुरू असून गेल्या ४९ दिवसात धरणातील एकूण जीवंत साठ्यापेक्षा जास्त म्हणजे ७८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दरवाजातून २१०२ दलघमी, जलविद्युत प्रकल्पातून २८ दलघमी व उजव्या कालव्यातून १७ दलघमी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

१९७५ पासून विसर्ग; यंदाचे २१ वे वर्षजायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८ इंचाने उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदा ९४००० क्युसेक्स जास्तीत जास्त क्षमतेने विसर्ग झाला आहे.

१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते. यंदा सुरक्षित विसर्ग झाल्याने गोदाकाठच्या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद