शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:59 IST

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष

ठळक मुद्देसप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झालाया पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे.विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता

पैठण : जायकवाडी धरणातून गेल्या ४९ दिवसापासून विसर्ग करण्यात येत असून या कालावधीत धरणातून आणखी एक धरण भरेल ईतके पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या ईतिहासात २००६ ला सर्वाधिक १०२ टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यानंतर यंदा आजच्या तारखेपर्यंत ७८ टिएमसी पाणी सोडण्यात आले असून अद्याप धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष असून यंदा जायकवाडी धरणा बाबत प्रचलित  नोंदी सोडून आगळ्या वेगळ्या नोंदी झाल्या आहेत. सप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून सतत ४९ दिवस पाणी सोडण्याचा यंदा विक्रम झाला आहे. या पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यंदा धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असून विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता धरण अभियंता संदिप राठोड यांनी  केली आहे. दरवर्षी नाशिक-नगरच्या पाण्यावर अवलंबून असलेले धरण यंदा आत्मनिर्भर झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाल्याने दोन वेळेस धरण भरेल ईतके पाणी जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातून दाखल झाले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून यंदा १० टिएमसी पाणी दाखल झाल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

यंदा ४९ दिवसात ७८ टिएमसी विसर्ग......जायकवाडी धरणातून विसर्ग सध्याही सुरू असून गेल्या ४९ दिवसात धरणातील एकूण जीवंत साठ्यापेक्षा जास्त म्हणजे ७८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दरवाजातून २१०२ दलघमी, जलविद्युत प्रकल्पातून २८ दलघमी व उजव्या कालव्यातून १७ दलघमी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

१९७५ पासून विसर्ग; यंदाचे २१ वे वर्षजायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८ इंचाने उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदा ९४००० क्युसेक्स जास्तीत जास्त क्षमतेने विसर्ग झाला आहे.

१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते. यंदा सुरक्षित विसर्ग झाल्याने गोदाकाठच्या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद