शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून ४९ दिवसात ७८ टीएमसी पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 18:59 IST

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष

ठळक मुद्देसप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झालाया पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे.विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता

पैठण : जायकवाडी धरणातून गेल्या ४९ दिवसापासून विसर्ग करण्यात येत असून या कालावधीत धरणातून आणखी एक धरण भरेल ईतके पाणी सोडण्यात आले आहे. जायकवाडी धरणाच्या ईतिहासात २००६ ला सर्वाधिक १०२ टिएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, त्यानंतर यंदा आजच्या तारखेपर्यंत ७८ टिएमसी पाणी सोडण्यात आले असून अद्याप धरणातून विसर्ग सुरू असल्याचे जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणातून सन १९७५ पासून विसर्ग करण्यात येत आहे. पाणी सोडण्याचे यंदाचे हे २१ वे वर्ष असून यंदा जायकवाडी धरणा बाबत प्रचलित  नोंदी सोडून आगळ्या वेगळ्या नोंदी झाल्या आहेत. सप्टेंबर ५ पासून धरणातून पाणी सोडण्यास प्रारंभ झाला असून सतत ४९ दिवस पाणी सोडण्याचा यंदा विक्रम झाला आहे. या पूर्वी धरणातून १५ ते १७ दिवस पाणी सोडल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यंदा धरणातून अद्यापही विसर्ग सुरू असून विसर्ग आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता धरण अभियंता संदिप राठोड यांनी  केली आहे. दरवर्षी नाशिक-नगरच्या पाण्यावर अवलंबून असलेले धरण यंदा आत्मनिर्भर झाल्याचे समोर आले आहे. स्थानिक पाणलोट क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाल्याने दोन वेळेस धरण भरेल ईतके पाणी जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रातून दाखल झाले आहे. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून यंदा १० टिएमसी पाणी दाखल झाल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

यंदा ४९ दिवसात ७८ टिएमसी विसर्ग......जायकवाडी धरणातून विसर्ग सध्याही सुरू असून गेल्या ४९ दिवसात धरणातील एकूण जीवंत साठ्यापेक्षा जास्त म्हणजे ७८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या दरवाजातून २१०२ दलघमी, जलविद्युत प्रकल्पातून २८ दलघमी व उजव्या कालव्यातून १७ दलघमी पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

१९७५ पासून विसर्ग; यंदाचे २१ वे वर्षजायकवाडी धरणाच्या दरवाज्यांचे काम बाकी असताना १९७५ मध्ये पैठण येथून ३९८५२ क्युसेक्स विसर्ग झाल्याची नोंद आहे. १९७६ ला धरणाचे २७ दरवाजे ८ इंचाने उचलून प्रथमच १५०,००० क्युसेक्स असा विसर्ग करण्यात आला. १९७५ ते १९८१ असे सलग सात वर्ष  धरणातून विसर्ग करावा लागला. १९८२ ला विसर्ग करावा लागला नाही मात्र १९८३ ला ८०१९५ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला. १९८४ ते १९८७ या चार वर्षात धरणात अपेक्षित जलसाठा न झाल्याने विसर्ग करावा लागला नाही. १९८८ ला नाममात्र विसर्ग करण्यात आला. पुन्हा १९८९ हे वर्ष कोरडे गेले. १९९० ला महापूर आल्याने १८७६५२ क्युसेक्स अशा मोठ्या क्षमतेने विसर्ग करावा लागला. १९९१ लाही ५९४०८ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग झाला. १९९२ ते १९९७ या सहा वर्षात १९९४ ला पाणी सोडावे लागले बाकीचे वर्षे कोरडेच राहिले. यानंतर १९९८ व ९९ सलग दोन वर्ष विसर्ग झाला.

२००० नंतर धरण भरण्याचे प्रमाण घटलेसन २००० ते २०२० या २१ वर्षाच्या दरम्यान  १४ वर्ष धरणातून पाणी सोडण्याचा प्रसंग आला नाही. २००० ते २००४ व २००९ ते २०१६ असे सलग व २०१८  या दरम्यान धरणातील जलसाठा काटकसरीने वापरावा लागला. मात्र या २१ वर्षात २००५ ते २००८ या दरम्यान धरणातून मोठ्या क्षमतेने पाणी सोडावे लागले.  २०१७ ला २७८४६ क्युसेक्स व २०१९ ला ५०३०४ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग केला गेला. यंदा ९४००० क्युसेक्स जास्तीत जास्त क्षमतेने विसर्ग झाला आहे.

१९९० व २००६ ला पैठण शहरात पूर.....१९९० ला १२ ऑक्टोबर रोजी धरणातून १८७६५२ क्युसेक्स क्षमतेने विसर्ग करण्यात आला होता. पैठण शहराखालील बंधाऱ्याचे दरवाजे वेळीच उघडण्यात अपयश आल्याने पैठण शहरात पुर आला होता. २००६ ला धरणातून ऑगस्ट महिण्यात २,५०,६९५ असा मोठा विसर्ग करण्यात आल्याने सहा दिवस अर्धे पैठण शहर पाण्याखाली होते. यंदा सुरक्षित विसर्ग झाल्याने गोदाकाठच्या तालुक्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabadऔरंगाबाद