शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग; आवक वाढल्याने १८ दरवाजे दोन फुटांनी उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:40 IST

गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

ठळक मुद्देविसर्ग वाढल्याने जायकवाडी धरणाखालील पूल पाण्याखाली गेलाधरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद 

पैठण : जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने धरणातून रात्री ३७,७२८ क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. रात्री ८ ते ८.३० वाजेदरम्यान धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलण्यात आले. यात धरणाखालील पूल पाण्याखाली गेला असून, दक्षिण जायकवाडीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. दरम्यान, गोदाकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

रविवारी दुपारपर्यंत धरणातून २५,१५२ क्युसेक विसर्ग जायकवाडी धरणाच्या १८ दरवाजांतून सुरू होता, तर धरणामध्ये २१,४४२ क्युसेक आवक होत होती. आवक व विसर्ग, असा असताना धरणाचा जलसाठा ९९.४४ टक्के कायम होता. मात्र, दुपारनंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने रात्री धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी वर उचलून धरणातून १२,५७६ क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. त्यामुळे धरणातून ३७,७२८ क्युसेक विसर्ग सुरू होता. गोदावरी पात्रात मोठ्या क्षमतेने विसर्ग सुरू झाल्याने धरणाखालील पूल पाण्याखाली गेला होता.  धरण काठोकाठ भरत आले असताना येणारे पाणी सामावून घेण्यासाठी धरणातून विसर्ग वाढविण्यात आला असून, धरणाचा जलसाठा ९८.४० टक्के इतका कमी करण्यात येईल, असे जायकवाडीचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. 

रविवारी सायंकाळी नाथसागराची  पाणीपातळी १,५२१.९० फुटांपर्यंत, तर ४६३.८७५ मीटरमध्ये झाली होती. धरणात आवक  २१,४४२ क्युसेक होत होती. धरणाचा एकूण जलसाठा २,८९७.१०० दलघमी, तर जिवंत पाणीसाठा २,१५८.९९४ दलघमी झालेला आहे. धरणाची टक्केवारी ९९.४४ टक्के झाली असून, उजव्या कालव्यातून   ६०० क्युसेक व डाव्या कालव्यातून १,५०० क्युसेक विसर्ग सुरू आहे, असे धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले. आवक लक्षात घेता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते, असे राजेंद्र काळे म्हणाले.

धरणाकडे जाणारे रस्ते पोलिसांकडून बंद जायकवाडी धरणाकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून, तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धरण परिसरात पायी जाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. धरणातून पाणी सोडल्यानंतर पर्यटकांची गर्दी होते. कोविडच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून प्रशासनाने पर्यटकांना बंदी घातली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी दिली.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणी