शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे; नवीन वर्षात होणार सुरुवात

By विकास राऊत | Updated: December 28, 2023 19:56 IST

रोज एका शाळेत जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम प्रशिक्षण देण्यासाठी जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहेत. नवीन वर्षात या उपक्रमाची ग्रामीण १८ व शहरातील २ शाळांमध्ये सुरुवात होणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा-महाविद्यालयांची निवड करण्यात आली असून, रोज एका शाळेत जिल्हा प्रशासनाच्या अखत्यारीत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम प्रशिक्षण देण्यासाठी जाणार आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते या उपक्रमाचा नवीन वर्षात शुभारंभ हाेईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एक हजारावर पटसंख्या असणाऱ्या २० माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांची निवड केली आहे. त्यातील दोन शाळा या शहरातील आहेत. अपघात व वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जाणार आहेत. माध्यमिक, उच्च माध्यमिक यातील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विभागातील पथकासह शासकीय कर्मचारी माहिती देतील. जिल्ह्यात काही तालुक्यांतील अनेक शाळा गावापासून दूर दुर्गम भागात आहेत. काही शाळा पत्र्यांच्या आहेत. शाळांपासून गाव, दवाखाने, पोलिस ठाणे दूर आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना काही आपत्कालीन संकट आले तर काळजी घेत काय उपाययोजना करायची, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षणादरम्यान दाखविले जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी गॅस सेफ्टी कार्यक्रमांतर्गत गॅस गळती यासारखी दुर्घटना घडली किंवा स्फोट झाला तर काय काळजी घ्यायची, याची माहिती देण्यात येणार आहे.

या आपत्तीचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन...भूकंप, साथरोग, रस्ते अपघात, सर्पदंश, आगीपासून संरक्षण, पूर परिस्थिती, वीज पडणे, दुष्काळ संबंधी आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेमलेले पथक विद्यार्थ्यांना काय करावे, काय करु नये यासंबंधी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद