शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

डिझेल, ऑइलचा ठणठणाट, बस आगारातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ठणठणाट होतो आहे. त्यामुळे अन्य आगारांतून डिझेल घेण्याची अथवा बसगाड्या आगारांतच उभ्या करण्याची वेळ येत आहे.

मध्यवर्ती बसस्थानक आगारातील पंपाचे डिझेल संपल्याने १२ जुलै रोजी अनेक मार्गांवरील बस आगारातच उभ्या राहिल्या. आठवडाभरापूर्वी, ७ ऑगस्ट रोजी सिडको बसस्थानकाच्या आगारातील डिझेल संपल्याने काही मार्गांवरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारातील पंपातून डिझेल भरून बस रवाना करण्यात आल्या. ही काही एखाद, दोन दिवसांची स्थिती नाही, तर हा प्रकार वारंवार होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक दिवस ठप्प झालेली बससेवा पूर्वपदावर आली. मात्र, प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे डिझेल, ऑइलसह एसटीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. डिझेलसाठी रक्कमेची जुळवाजुळव करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे डिझेल येण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. परिणामी, बसफेऱ्या रद्द करण्याचीही वेळ ओढावत आहे.

इतर आगारांना, विभागांना डिझेल बंद

एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आगारांकडून दुसऱ्या आगारांतील, विभागांतील बसगाड्यांना डिझेल देणे बंद केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केवळ अत्यावश्यक प्रसंगीच डिझेल दिले जाते, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

सध्या डिझेलची अडचण नाही

सध्या डिझेलची कोणतीही अडचण नाही. ग्रामीण भागातून बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. बऱ्याच शाळा बंद आहे. त्यामुळे काही बस आगारातच उभ्या राहतात. औरंगाबाद विभागाचे सध्या रोजचे उत्पन्न ३८ लाखांवर आले आहे.

- अमोल अहिरे, विभागीय वाहतूक अधिकारी

----

१७२ बस आगारातच

एसटी महामंडळाच्या ५६० पैकी ३८८ बस धावत आहेत. त्यामुळे १७२ बस आगारातच उभ्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात येतात. गर्दी नसेल तर त्या मार्गावर बस सोडण्यात येत नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

जिल्ह्यातील कोरोनाकाळातील तोटा

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न हे साधारण ५० लाख रुपये आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन होते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध होते. तब्बल ४५ दिवस बससेवेला फटका बसला. यातून २२ कोटींचे नुकसान झाले. कोरोना काळाच्या १४ महिन्यांत औरंगाबाद विभागाला १३३ कोटींच्या उत्पन्नांवर पाणी सोडावे लागले.