शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल, ऑइलचा ठणठणाट, बस आगारातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ठणठणाट होतो आहे. त्यामुळे अन्य आगारांतून डिझेल घेण्याची अथवा बसगाड्या आगारांतच उभ्या करण्याची वेळ येत आहे.

मध्यवर्ती बसस्थानक आगारातील पंपाचे डिझेल संपल्याने १२ जुलै रोजी अनेक मार्गांवरील बस आगारातच उभ्या राहिल्या. आठवडाभरापूर्वी, ७ ऑगस्ट रोजी सिडको बसस्थानकाच्या आगारातील डिझेल संपल्याने काही मार्गांवरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारातील पंपातून डिझेल भरून बस रवाना करण्यात आल्या. ही काही एखाद, दोन दिवसांची स्थिती नाही, तर हा प्रकार वारंवार होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक दिवस ठप्प झालेली बससेवा पूर्वपदावर आली. मात्र, प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे डिझेल, ऑइलसह एसटीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. डिझेलसाठी रक्कमेची जुळवाजुळव करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे डिझेल येण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. परिणामी, बसफेऱ्या रद्द करण्याचीही वेळ ओढावत आहे.

इतर आगारांना, विभागांना डिझेल बंद

एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आगारांकडून दुसऱ्या आगारांतील, विभागांतील बसगाड्यांना डिझेल देणे बंद केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केवळ अत्यावश्यक प्रसंगीच डिझेल दिले जाते, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

सध्या डिझेलची अडचण नाही

सध्या डिझेलची कोणतीही अडचण नाही. ग्रामीण भागातून बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. बऱ्याच शाळा बंद आहे. त्यामुळे काही बस आगारातच उभ्या राहतात. औरंगाबाद विभागाचे सध्या रोजचे उत्पन्न ३८ लाखांवर आले आहे.

- अमोल अहिरे, विभागीय वाहतूक अधिकारी

----

१७२ बस आगारातच

एसटी महामंडळाच्या ५६० पैकी ३८८ बस धावत आहेत. त्यामुळे १७२ बस आगारातच उभ्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात येतात. गर्दी नसेल तर त्या मार्गावर बस सोडण्यात येत नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

जिल्ह्यातील कोरोनाकाळातील तोटा

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न हे साधारण ५० लाख रुपये आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन होते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध होते. तब्बल ४५ दिवस बससेवेला फटका बसला. यातून २२ कोटींचे नुकसान झाले. कोरोना काळाच्या १४ महिन्यांत औरंगाबाद विभागाला १३३ कोटींच्या उत्पन्नांवर पाणी सोडावे लागले.