शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल, ऑइलचा ठणठणाट, बस आगारातच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात एसटी महामंडळाच्या उत्पन्नात घट झाली. परिणामी, कधी डिझेल तर कधी ऑइलचा आगारांमध्ये ठणठणाट होतो आहे. त्यामुळे अन्य आगारांतून डिझेल घेण्याची अथवा बसगाड्या आगारांतच उभ्या करण्याची वेळ येत आहे.

मध्यवर्ती बसस्थानक आगारातील पंपाचे डिझेल संपल्याने १२ जुलै रोजी अनेक मार्गांवरील बस आगारातच उभ्या राहिल्या. आठवडाभरापूर्वी, ७ ऑगस्ट रोजी सिडको बसस्थानकाच्या आगारातील डिझेल संपल्याने काही मार्गांवरील बसच्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आगारातील पंपातून डिझेल भरून बस रवाना करण्यात आल्या. ही काही एखाद, दोन दिवसांची स्थिती नाही, तर हा प्रकार वारंवार होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक दिवस ठप्प झालेली बससेवा पूर्वपदावर आली. मात्र, प्रवाशांची संख्या घटल्याने उत्पन्नावर परिणाम झाला. त्यामुळे डिझेल, ऑइलसह एसटीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. डिझेलसाठी रक्कमेची जुळवाजुळव करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे डिझेल येण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात. परिणामी, बसफेऱ्या रद्द करण्याचीही वेळ ओढावत आहे.

इतर आगारांना, विभागांना डिझेल बंद

एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील आगारांकडून दुसऱ्या आगारांतील, विभागांतील बसगाड्यांना डिझेल देणे बंद केले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी केवळ अत्यावश्यक प्रसंगीच डिझेल दिले जाते, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

सध्या डिझेलची अडचण नाही

सध्या डिझेलची कोणतीही अडचण नाही. ग्रामीण भागातून बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. बऱ्याच शाळा बंद आहे. त्यामुळे काही बस आगारातच उभ्या राहतात. औरंगाबाद विभागाचे सध्या रोजचे उत्पन्न ३८ लाखांवर आले आहे.

- अमोल अहिरे, विभागीय वाहतूक अधिकारी

----

१७२ बस आगारातच

एसटी महामंडळाच्या ५६० पैकी ३८८ बस धावत आहेत. त्यामुळे १७२ बस आगारातच उभ्या आहेत. प्रवाशांच्या गर्दीनुसार बस सोडण्यात येतात. गर्दी नसेल तर त्या मार्गावर बस सोडण्यात येत नाही, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

------

जिल्ह्यातील कोरोनाकाळातील तोटा

एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाचे रोजचे उत्पन्न हे साधारण ५० लाख रुपये आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी लाॅकडाऊन होते. जवळपास २२३ दिवस बससेवेवर परिणाम झाला. यातून १११ कोटींचे नुकसान झाले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे निर्बंध होते. तब्बल ४५ दिवस बससेवेला फटका बसला. यातून २२ कोटींचे नुकसान झाले. कोरोना काळाच्या १४ महिन्यांत औरंगाबाद विभागाला १३३ कोटींच्या उत्पन्नांवर पाणी सोडावे लागले.