शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
5
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
6
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
7
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
8
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
9
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
10
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
11
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
12
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
13
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
14
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
15
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
16
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
17
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
18
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
19
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
20
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...

तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:46 IST

Corona vaccination in Aurangabad : ८५ दिवस संपूनही नागरिक लसीकरणासाठी येईनात यामुळे आरोग्य विभाग चिंतेत 

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची धडक मोहीम राबवून प्रशासनाने २५ दिवसांत पहिल्या डोसचे प्रमाण ५४ टक्क्यांवरून ७९ टक्क्यांवर आणले. दुसऱ्या डोसचे प्रमाण अजूनही वाढत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आता दुसरा डाेस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. पहिला डोस घेऊन ८५ दिवसांची मुदत संपणाऱ्यांना मोबाइलवरून संपर्क साधून लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ३ लाखांवर आहे.

राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाल्याने जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढविण्यावर भर दिला. जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपासून लसीकरणाची मोहीम हाती घेतली. गेल्या आठवड्यात लसीकरणाचा टक्का खाली गेल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण शंभर टक्के करण्याचे तर ८५ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस घेणाऱ्यांचे लक्ष्यपूर्ती करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

दुसरा डोस देण्याचे लक्ष्यजिल्ह्यात तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या डोसचे लसीकरण ५४ टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण २४ टक्क्यांवरच होते. प्रशासनाच्या मोहिमेनंतर पहिल्या डोसचे प्रमाण ७९ टक्क्यांवर गेले. दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३५.१४ टक्केच आहे. प्रत्यक्षात ही टक्केवारी ५० टक्क्यांवर येणे अपेक्षित होती. ग्रामीणमधील पावणेदोन लाख तर शहरातील सव्वा लाख अशा ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ८५ दिवसांची मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नाही. या नागरिकांना दुसरा डोस देण्याचे लक्ष्य पुढील काळात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या