शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

तुम्ही दुसरा डोस घेतला का ? जिल्ह्यात दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या तीन लाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 18:46 IST

Corona vaccination in Aurangabad : ८५ दिवस संपूनही नागरिक लसीकरणासाठी येईनात यामुळे आरोग्य विभाग चिंतेत 

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची धडक मोहीम राबवून प्रशासनाने २५ दिवसांत पहिल्या डोसचे प्रमाण ५४ टक्क्यांवरून ७९ टक्क्यांवर आणले. दुसऱ्या डोसचे प्रमाण अजूनही वाढत नसल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आता दुसरा डाेस घेण्यासाठी नागरिकांना आवाहन केले आहे. पहिला डोस घेऊन ८५ दिवसांची मुदत संपणाऱ्यांना मोबाइलवरून संपर्क साधून लस घेण्याचे आवाहन केले जात आहे. दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या ३ लाखांवर आहे.

राज्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा प्रवेश झाल्याने जिल्हा प्रशासनाने लसीकरण वाढविण्यावर भर दिला. जिल्ह्यात ९ नोव्हेंबरपासून लसीकरणाची मोहीम हाती घेतली. गेल्या आठवड्यात लसीकरणाचा टक्का खाली गेल्याने प्रशासनाने चिंता व्यक्त केली. पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण शंभर टक्के करण्याचे तर ८५ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस घेणाऱ्यांचे लक्ष्यपूर्ती करण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.

दुसरा डोस देण्याचे लक्ष्यजिल्ह्यात तीन आठवड्यांपूर्वी पहिल्या डोसचे लसीकरण ५४ टक्के तर दुसऱ्या डोसचे प्रमाण २४ टक्क्यांवरच होते. प्रशासनाच्या मोहिमेनंतर पहिल्या डोसचे प्रमाण ७९ टक्क्यांवर गेले. दुसरा डोस घेणाऱ्यांची टक्केवारी ३५.१४ टक्केच आहे. प्रत्यक्षात ही टक्केवारी ५० टक्क्यांवर येणे अपेक्षित होती. ग्रामीणमधील पावणेदोन लाख तर शहरातील सव्वा लाख अशा ३ लाखांहून अधिक नागरिकांनी ८५ दिवसांची मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नाही. या नागरिकांना दुसरा डोस देण्याचे लक्ष्य पुढील काळात आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या