शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:27 IST

शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : शहरात मंगळवारी दुपारी पावसाने एकीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला; परंतु दुसरीकडे शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात जागोजागी आणि रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाच्या पाण्याने कचरा भिजला, ही शहराच्या आरोग्यासाठी सर्वांत गंभीर बाब आहे. ओल्या कचऱ्यात आजारांना आमंत्रण देणारे विषाणू वाढून विविध आजार डोकेवर काढू शकतात. शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत कचरा वाहून रस्त्यावर आला आहे. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेकदा विविध ठिकाणी जलवाहिनींना गळती असते. त्यामुळे यातून दूषित पाणीपुरवठा होण्याचा प्रकार होऊन जलजन्य विकारांमध्ये वाढ होण्यास हातभार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील विविध भागांत जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि त्यात पडलेला पाऊस यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. कचऱ्यामुळे आधीच सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या पावसाने कचरा सडून त्यातून आणखी दुर्गंधी पसरण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले जात आहे.

मनपाकडून औषध फवारणीही बंदशहरात मागील ५४ दिवसांपासून कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडी फोडण्यात अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. जुन्या शहरातील विविध चौकांमध्ये कचरा पडून आहे. या कचऱ्यावर मनपाकडून औषध फवारणी करण्यात येत होती. आता मनपाने औषध फवारणीही बंद केली. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दुर्गंधीत अधिक वाढ झाली आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. सुरुवातीला कचऱ्यावर माशा बसू नयेत म्हणून बायोट्रिट पावडरची फवारणी करण्यात येत होती. एक आठवडाच औैषध फवारणी करण्यात आली. त्यानंतर मनपाने फवारणी बंद केली. मनपाच्या झोन १, २ आणि ३ मध्ये सर्वाधिक कचऱ्याचे डोंगर आहेत. या तिन्ही झोनमध्ये कचऱ्याचे अजिबात वर्गीकरण होत नाही. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी मनपाकडून फारसे प्रयत्नही होताना दिसून येत नाहीत. ज्या वसाहतींमध्ये कचरा साचलेला आहे, त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्यात लागत आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर दुर्गंधीत अधिक भर पडली आहे.

आणखी पाऊस पडला तर...शहरातील कचऱ्याची परिस्थिती पाहता एक पाऊसही चिंतादायक ठरू शकतो, अशा परिस्थितीत आणखी एक, दोन दिवस जरी पाऊस पडला तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. साथरोग पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. 

आजारांना आमंत्रणपावसामुळे कचरा ओला झाला आहे. अशा ओल्या कचऱ्यात विविध आजारांना आमंत्रण देणारे जंतू वाढू शकतात. डायरिया, कॉलरा, कावीळ, मलेरिया यासह विषाणू आणि जलजन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. -डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशिय असोसिएशन, औरंगाबाद

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्यMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद