शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:27 IST

शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : शहरात मंगळवारी दुपारी पावसाने एकीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला; परंतु दुसरीकडे शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात जागोजागी आणि रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाच्या पाण्याने कचरा भिजला, ही शहराच्या आरोग्यासाठी सर्वांत गंभीर बाब आहे. ओल्या कचऱ्यात आजारांना आमंत्रण देणारे विषाणू वाढून विविध आजार डोकेवर काढू शकतात. शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत कचरा वाहून रस्त्यावर आला आहे. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेकदा विविध ठिकाणी जलवाहिनींना गळती असते. त्यामुळे यातून दूषित पाणीपुरवठा होण्याचा प्रकार होऊन जलजन्य विकारांमध्ये वाढ होण्यास हातभार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील विविध भागांत जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि त्यात पडलेला पाऊस यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. कचऱ्यामुळे आधीच सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या पावसाने कचरा सडून त्यातून आणखी दुर्गंधी पसरण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले जात आहे.

मनपाकडून औषध फवारणीही बंदशहरात मागील ५४ दिवसांपासून कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडी फोडण्यात अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. जुन्या शहरातील विविध चौकांमध्ये कचरा पडून आहे. या कचऱ्यावर मनपाकडून औषध फवारणी करण्यात येत होती. आता मनपाने औषध फवारणीही बंद केली. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दुर्गंधीत अधिक वाढ झाली आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. सुरुवातीला कचऱ्यावर माशा बसू नयेत म्हणून बायोट्रिट पावडरची फवारणी करण्यात येत होती. एक आठवडाच औैषध फवारणी करण्यात आली. त्यानंतर मनपाने फवारणी बंद केली. मनपाच्या झोन १, २ आणि ३ मध्ये सर्वाधिक कचऱ्याचे डोंगर आहेत. या तिन्ही झोनमध्ये कचऱ्याचे अजिबात वर्गीकरण होत नाही. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी मनपाकडून फारसे प्रयत्नही होताना दिसून येत नाहीत. ज्या वसाहतींमध्ये कचरा साचलेला आहे, त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्यात लागत आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर दुर्गंधीत अधिक भर पडली आहे.

आणखी पाऊस पडला तर...शहरातील कचऱ्याची परिस्थिती पाहता एक पाऊसही चिंतादायक ठरू शकतो, अशा परिस्थितीत आणखी एक, दोन दिवस जरी पाऊस पडला तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. साथरोग पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. 

आजारांना आमंत्रणपावसामुळे कचरा ओला झाला आहे. अशा ओल्या कचऱ्यात विविध आजारांना आमंत्रण देणारे जंतू वाढू शकतात. डायरिया, कॉलरा, कावीळ, मलेरिया यासह विषाणू आणि जलजन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. -डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशिय असोसिएशन, औरंगाबाद

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्यMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद