शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

ठिकठिकाणी साचलेला कचरा सडल्याने शहरात डायरिया, मलेरिया, कॉलराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 19:27 IST

शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देशहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : शहरात मंगळवारी दुपारी पावसाने एकीकडे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा दिला; परंतु दुसरीकडे शहरात जागोजागी झालेल्या कचराकोंडीमुळे अवकाळी पावसाने डायरिया, मलेरिया, कॉलरा, कावीळसह विषाणूजन्य आणि जलजन्य आजार बळावण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून कचरा विल्हेवाटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक भागात जागोजागी आणि रस्तोरस्ती कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मंगळवारी पडलेला पाऊस विविध आजारांना आमंत्रण देणारा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पावसाच्या पाण्याने कचरा भिजला, ही शहराच्या आरोग्यासाठी सर्वांत गंभीर बाब आहे. ओल्या कचऱ्यात आजारांना आमंत्रण देणारे विषाणू वाढून विविध आजार डोकेवर काढू शकतात. शहरात ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासोबत कचरा वाहून रस्त्यावर आला आहे. पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचले. अनेकदा विविध ठिकाणी जलवाहिनींना गळती असते. त्यामुळे यातून दूषित पाणीपुरवठा होण्याचा प्रकार होऊन जलजन्य विकारांमध्ये वाढ होण्यास हातभार लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरातील विविध भागांत जागोजागी पडलेले कचऱ्याचे ढीग, स्वच्छतेकडे दुर्लक्ष आणि त्यात पडलेला पाऊस यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. कचऱ्यामुळे आधीच सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या पावसाने कचरा सडून त्यातून आणखी दुर्गंधी पसरण्याची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगितले जात आहे.

मनपाकडून औषध फवारणीही बंदशहरात मागील ५४ दिवसांपासून कचराकोंडी सुरू आहे. कचराकोंडी फोडण्यात अद्याप महापालिकेला यश आलेले नाही. जुन्या शहरातील विविध चौकांमध्ये कचरा पडून आहे. या कचऱ्यावर मनपाकडून औषध फवारणी करण्यात येत होती. आता मनपाने औषध फवारणीही बंद केली. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे दुर्गंधीत अधिक वाढ झाली आहे.

१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी सुरू आहे. सुरुवातीला कचऱ्यावर माशा बसू नयेत म्हणून बायोट्रिट पावडरची फवारणी करण्यात येत होती. एक आठवडाच औैषध फवारणी करण्यात आली. त्यानंतर मनपाने फवारणी बंद केली. मनपाच्या झोन १, २ आणि ३ मध्ये सर्वाधिक कचऱ्याचे डोंगर आहेत. या तिन्ही झोनमध्ये कचऱ्याचे अजिबात वर्गीकरण होत नाही. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून द्यावा यासाठी मनपाकडून फारसे प्रयत्नही होताना दिसून येत नाहीत. ज्या वसाहतींमध्ये कचरा साचलेला आहे, त्या भागात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीच्या यातना सहन कराव्यात लागत आहेत. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसानंतर दुर्गंधीत अधिक भर पडली आहे.

आणखी पाऊस पडला तर...शहरातील कचऱ्याची परिस्थिती पाहता एक पाऊसही चिंतादायक ठरू शकतो, अशा परिस्थितीत आणखी एक, दोन दिवस जरी पाऊस पडला तर अधिक गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. साथरोग पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. 

आजारांना आमंत्रणपावसामुळे कचरा ओला झाला आहे. अशा ओल्या कचऱ्यात विविध आजारांना आमंत्रण देणारे जंतू वाढू शकतात. डायरिया, कॉलरा, कावीळ, मलेरिया यासह विषाणू आणि जलजन्य आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. -डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, फिजिशिय असोसिएशन, औरंगाबाद

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHealthआरोग्यMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद