शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तुमचा एक कॉल थांबवू शकतो बालविवाह; चाइल्ड लाइनसाठी डायल करा टोलफ्री क्रमांक १०९८

By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 15, 2024 18:56 IST

जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत.

छत्रपती संभाजीनगर : राज्यात बालविवाहांची संख्या मोठी आहे. पण, आता बालविवाह रोखण्यासाठी सरकारी यंत्रणेला गावकरी साथ देत असल्याने हे प्रकार उजेडात येऊ लागले आहेत. तुमच्या गावात, घर परिसरात कुठे बालविवाह होत असले तर थेट टोल फ्री नंबर १०९८ वर कॉल करा, सरकारी यंत्रणा तिथे येऊन तो बालविवाह रोखतील.

जिल्ह्यात ४१ बालविवाह रोखलेतालुका रोखलेले बालविवाह संख्या१) छ. संभाजीनगर १४२) पैठण १२३) गंगापूर ६४) वैजापूर ३५) खुलताबाद ३६) कन्नड १७) फुलंब्री १८) सिल्लोड १९) सोयगाव ०

किती वर्षाच्या आत लग्न कायद्याने गुन्हा ठरू शकतो१) मुलीचे वय १८ वर्षांच्या आत व मुलाचे वय २१ वर्षांच्या आत असेल तर त्यांचा बालविवाह समजण्यात येतो.२) बालविवाह अधिनियम २००६ नियम २२ अन्वये बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.३) २ वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद, एक लाख रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा.

कोणावर दाखल होऊ शकतो गुन्हाबालविवाह होत असताना हजर असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. बालविवाह लावणाऱ्या गुरुजींपासून ते आई-वडील वऱ्हाडी, बँड, डिजेवाल्यांपर्यंत सर्वांवर गुन्हे दाखल होऊ शकतात.

चाइल्ड लाइनचा नंबर १०९८ कॉल कराबालविवाह होत असल्यास तुम्ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर किंवा चाइल्ड लाइनला १०९८ यानंबरवर कॉल करा. जो कॉल करून माहिती देतो त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच या नंबरवर कॉल केला तर त्याचे पैसे लागत नाहीत. तो नंबर विनाशुल्क आहे.

बालविवाह रोखण्याची कोणावर जबाबदारी ?१) ग्रामपंचायत क्षेत्र : ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह होत असले तर त्यास रोखण्याची जबाबदारी सर्व गावकऱ्यांवर आहे. मात्र, शासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक हा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे. अंगणवाडी सेविकांना सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.२) शहरी भाग : शासनाच्या आदेशानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून शासनाने घोषित केले आहे.

जागरूक रहा, फोन करून कळवाबालविवाह होताना तुम्ही बघ्याची भूमिका घेऊ नका, नाही तर वऱ्हाडी म्हणून तुमच्यावरही गुन्हा दाखल होईल. शहरवासी असो की गावकरी सर्वांनी ‘सावधान’ राहण्याची आवश्यकता आहे. सजग राहा, लहान मुलींचे लग्न लावण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही एक फोन करुन शासनाला माहिती कळवा. तुमचा एक फोन त्या लहान मुलीचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचू शकते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद