शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन पडले बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 12:49 IST

तब्बल दीड तासानंतर दुसरे इंजिन झाले रवाना

ठळक मुद्देमनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबविण्यात आले दुपारी १२ च्या दरम्यान दुसरे इंजिन रवाना करण्यात आले

बदनापूर/औरंगाबाद : बदनापूरहुन औरंगाबादकडे जाणाऱ्या धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन करमाड येथे अचानक बंद पडले.  सकाळी 10:30 वाजेच्या दरम्यान अचानक मोठा आवाज होऊन हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन बंद पडले. यामुळे सुमारे दोन तास प्रवास्यांचे अतोनात हाल झाले. दरम्यान, धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस बंद पडल्याने मनमाड- काचीगुडा पॅसेंजर गाडीला चिखलठाणा रेल्वे स्टेशन येथे थांबवून ठेवण्यात आली.

सकाळी साडेनऊ ला बदनापूरहुन मनमाडकडे जाणारी हायकोर्ट एक्सप्रेस आज करमाडजवळ गेल्यानंतर तिचे इंजिन अचानक फेल झाले त्यामुळे हजारो प्रवासी मधेच अडकले. त्यानंतर औरंगाबादहून मनमाड-काचीगुडा ही रेल्वे बदनापूरकडे जात असताना तिला चिकलठाणा येथे थांबविण्यात आले. या गाडीचे इंजिन करमाडकडे हायकोर्टसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे मनमाड काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेतील प्रवाशीही चिकलठाणा रेल्वे स्थानकावर तासनतास अडकले. सुमारे बारा वाजेच्या सुमारास हायकोर्ट एक्सप्रेस चिकलठाणा येथे आली होती. मात्र दोन तास ताटकळल्याने या दोन्ही रेल्वेतील हजारो रेल्वे प्रवाशांची मोठी दयनीय अवस्था झाली होती. 

मनमाड-काचीगुडा या रेल्वेतील अनेक प्रवासी बारा वाजेच्या सुमारास आलेल्या सचखंड एक्सप्रेसमध्ये बसुन पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र मनमाड काचीगुडा हि रेल्वे चिकलठाणा स्थानकावरच उभी होती. या पॅसेंजरमधून प्रवास करणारे दिपक मुंडलीक म्हणाले की, रेल्वे प्रशासनाचा गलथान कारभारामुळे प्रवास्यांचे हाल झाले. ही पॅसेंजर चिकलठाणामध्ये  उभी करण्यापेक्षा करमाडपर्यंत आणली असती तर प्रवास्यांना पुढे अन्य वाहनांनी जाता आले असते त्यांचा वेळही वाचला असता.

मनमाड- काचीगुडा पॅसेंजरसाठी जालन्याहून इंजिन रेल्वे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, करमाडजवळ  धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेसचे इंजिन सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान अचानक बंद पडले. या रेल्वेसाठी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनमाड- काचीगुडा या पॅसेंजर रेल्वेचे इंजिन पाठविण्यात आले आहे. इंजिन करमाड रेल्वे स्टेशनच्या दिशेन रवाना झाले असून या इंजिनच्या सहाय्याने धर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्सप्रेस औरंगाबादकडे आणण्यात येईल. या दरम्यान  मनमाड- काचीगुडा पॅसेंजर चिखलठाणा रेल्वेस्टेशनवर थांबवून ठेवली आहे. या पॅसेंजर गाडीसाठी जालना येथून दुसरे इंजिन मागविण्यात आले आहे.

दरम्यान, इंजीनन काढल्याने मनमाड-काचीगुडा पॅसेंजर रेल्वेतील प्रवासी संतप्त झाले आणि त्यांनी अमृतसर-नांदेड सचखंड एक्सप्रेस चिखलठाणा येथे अडवून ठेवली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशन