शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ धानोरा ग्रामस्थांनी परत लावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 17:27 IST

मराठा आरक्षण मिळत नाही तो पर्यंत कोणतेही कार्यक्रम गावात होऊ देणार नाही

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : तालुक्यातील धानोरा गावात आज सकाळी साडेदहा वाजता विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमास ग्रामस्थांनी विरोध केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कोणतेही राजकीय, शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत ग्रामस्थांनी यात्रेचा रथ परत पाठवला.

तालुक्यातील भराडी व धानोरा येथे रथ यात्रा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण व तहसीलदार रमेश जसवंत यांनी नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे व अल्पसंख्याकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज सकाळी १० वाजता धानोरा येथे करण्यात येणार होते. मात्र, सकाळी १० वाजता ग्रामस्थांनी यात्रेचा रथ गावातून परत पाठवला. तसेच कार्यक्रमाचा मंडप देखील काढायला लावला.

तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. तहसीलदार रमेश जसवंत व उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी गावकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र धानोरा ग्रामस्थांनी माघार घेतली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी तेथून घेतला काढता पाय घेतला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार