शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: November 10, 2023 19:14 IST

या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान आणि मराठा समाजांचं एकच दुखणं आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

मनोज जरांगे हे शहरातील खाजगी रुग्णालयात २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून उपचार घेत आहेत. आता प्रकृती चांगली होत असल्याने त्यांनी दिवाळीनंतर राज्यात दौरा करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शुक्रवारी सकाळी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, उपोषण सोडताना राज्य सरकारने मराठा समाजाला दोन महिन्यांत आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. हा बॉण्ड जरांगे पाटील यांना देण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. मात्र, चार दिवसांपासून पाटील यांना ’तारीख पे तारीख’ मिळत आहे. 

याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र दोन, तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यस्त असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र मुद्दामहून जर टाळाटाळ करून समाजासोबत टोलवाटोलवी करणार असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्माईच्या पूजेचा मान जरांगे पाटील यांना द्यावा, अशी मागणी होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, समाजाच्या भावनेचा आपण आदर करतो. त्यांच्या या मागणीमुळे आताच आपल्या हस्ते पूजा झाल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासोबतच अन्य जातीमध्येही कुणबी नोंद आढळत आहेत, त्यांनाही आरक्षण द्यावे का, या प्रश्नाचे उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी द्यावे, असे म्हणून जरांगे यांनी भुजबळ यांना टोला लगावला. जरांगे म्हणाले., ज्यांच्या नोंदी आढळतात, ते सर्व आरक्षणास पात्र आहेत, असे आपले मत आहे.

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावेराज्य सरकार ओबीसी नेत्यांचे खूप लाड पुरवीत आहेत. सरकारने या ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावे आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण