शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: November 10, 2023 19:14 IST

या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान आणि मराठा समाजांचं एकच दुखणं आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

मनोज जरांगे हे शहरातील खाजगी रुग्णालयात २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून उपचार घेत आहेत. आता प्रकृती चांगली होत असल्याने त्यांनी दिवाळीनंतर राज्यात दौरा करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शुक्रवारी सकाळी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, उपोषण सोडताना राज्य सरकारने मराठा समाजाला दोन महिन्यांत आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. हा बॉण्ड जरांगे पाटील यांना देण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. मात्र, चार दिवसांपासून पाटील यांना ’तारीख पे तारीख’ मिळत आहे. 

याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र दोन, तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यस्त असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र मुद्दामहून जर टाळाटाळ करून समाजासोबत टोलवाटोलवी करणार असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्माईच्या पूजेचा मान जरांगे पाटील यांना द्यावा, अशी मागणी होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, समाजाच्या भावनेचा आपण आदर करतो. त्यांच्या या मागणीमुळे आताच आपल्या हस्ते पूजा झाल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासोबतच अन्य जातीमध्येही कुणबी नोंद आढळत आहेत, त्यांनाही आरक्षण द्यावे का, या प्रश्नाचे उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी द्यावे, असे म्हणून जरांगे यांनी भुजबळ यांना टोला लगावला. जरांगे म्हणाले., ज्यांच्या नोंदी आढळतात, ते सर्व आरक्षणास पात्र आहेत, असे आपले मत आहे.

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावेराज्य सरकार ओबीसी नेत्यांचे खूप लाड पुरवीत आहेत. सरकारने या ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावे आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण