शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

धनगर, मुसलमान अन् मराठा समाजांचं एकच दुखणं; तिघांनी एकत्र येण्याचे मनाेज जरांगेंचे आवाहन

By बापू सोळुंके | Updated: November 10, 2023 19:14 IST

या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा

छत्रपती संभाजीनगर : धनगर, मुसलमान आणि मराठा समाजांचं एकच दुखणं आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावं, आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार असल्याचे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. 

मनोज जरांगे हे शहरातील खाजगी रुग्णालयात २ नोव्हेंबरच्या रात्रीपासून उपचार घेत आहेत. आता प्रकृती चांगली होत असल्याने त्यांनी दिवाळीनंतर राज्यात दौरा करणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले. शुक्रवारी सकाळी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, उपोषण सोडताना राज्य सरकारने मराठा समाजाला दोन महिन्यांत आरक्षण देण्याची ग्वाही दिली होती. आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. हा बॉण्ड जरांगे पाटील यांना देण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहे. मात्र, चार दिवसांपासून पाटील यांना ’तारीख पे तारीख’ मिळत आहे. 

याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र दोन, तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यस्त असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र मुद्दामहून जर टाळाटाळ करून समाजासोबत टोलवाटोलवी करणार असाल तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. कार्तिक एकादशीला विठ्ठल-रुक्माईच्या पूजेचा मान जरांगे पाटील यांना द्यावा, अशी मागणी होत आहे, याविषयी विचारले असता ते म्हणाले, समाजाच्या भावनेचा आपण आदर करतो. त्यांच्या या मागणीमुळे आताच आपल्या हस्ते पूजा झाल्यासारखे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजासोबतच अन्य जातीमध्येही कुणबी नोंद आढळत आहेत, त्यांनाही आरक्षण द्यावे का, या प्रश्नाचे उत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी द्यावे, असे म्हणून जरांगे यांनी भुजबळ यांना टोला लगावला. जरांगे म्हणाले., ज्यांच्या नोंदी आढळतात, ते सर्व आरक्षणास पात्र आहेत, असे आपले मत आहे.

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावेराज्य सरकार ओबीसी नेत्यांचे खूप लाड पुरवीत आहेत. सरकारने या ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावे आणि मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. तसेच मराठा समाजाला २४ डिसेंबरच्या आत सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAurangabadऔरंगाबादMaratha Reservationमराठा आरक्षण