शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

ग्रामपंचायत निवडणुकीत धमाल; अनेक गावच्या सरपंच पदावर तीन पक्षांनी ठोकली दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:55 IST

निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला.

ठळक मुद्देगावगाड्याचा आकडा वाढविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

फुलंब्री तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतीमध्ये हेच चित्र दिसून येत आहे

फुलंब्री : तालुक्यातील सरपंच पदाची संख्या वाढविण्यासाठी आणि सर्वाधिक गावातील सत्ता आपल्याच पक्षाच्या हाती मिळावी म्हणून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. धामणगावच्या सरपंचपदावर तर चक्क शिवसेना, भाजपा व कॉंग्रेसच्यावतीने दावा करण्यात आला. मुळात धामणगावच्या सरपंचांना व सदस्यांना राजकीय पक्षाच्या या केविलवाणी दाव्याची माहितीदेखील नाही. त्यामुळे धामणगावावर नेमकी सत्ता तरी कोणाची, हा प्रश्न निरुत्तरच आहे.

तालुक्यात नुकत्याच ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर ४९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला. या सर्वांची गोळाबेरीज लावली असता तालुक्यात असलेल्या सदस्य संख्येपेक्षा जास्तीचा आकडा होऊ लागला आहे. दरम्यान सरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. आता या सरपंच पदावरही तिन्ही पक्षांच्यावतीने वेगवेगळे दावे केले जात आहेत. असे असले तरी जनतेला सत्य काय आहे, याची जाणीव तर आहेच. धामणगाव येथील सरपंचपदी सरसाबाई डिडोरे यांची निवड झाली. त्या आमच्याच पक्षाच्या सरपंच आहेत, असा दावा भाजप व शिवसेनेकडून पत्रकाद्वारे केला आहे, तर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तोंडी दावा केला आहे. वास्तविक अनेक गावात पॅनल तयार करताना विविध पक्षाशी निगडित उमेदवार घेतले गेले आहे. गावातील राजकारण वेगळे असते. सरपंचपद देताना काही ठिकाणी अडीच वर्षांची तडजोड करण्यात आली आहे. गावगाड्याच्या राजकारणात बहुतांश ठिकाणी पक्षाचा फारसा विचार केला गेला नाही. अशा परिस्थितीतदेखील राजकीय पक्षांची दावेदारी केविलवाणीच म्हणावी लागेल.

या गावांवर केला विविध पक्षांनी दावातालुक्यातील सुलतानवाडी, धामणगाव, सोनारी, दरेगाव दरी, सांजूळ या पाच ग्रामपंचायतमध्ये आमचाच सरपंच असल्याचा दावा शिवसेना व भाजपाच्यावतीने करण्यात आला. दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी पक्षाच्या लेटरहेडवर अशा प्रकरचे परिपत्रक काढून या गावाचा सरपंच आमच्या पक्षाचा असल्याचे जाहीर करून टाकले. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्षात सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत चर्चादेखील केली नाही. केवळ गावगाड्याची संख्या वाढविण्यासाठी असे फंडे वापरले जाऊ लागले आहेत. शिवाय महाल किन्होळा, साताळ पिंप्री, वाणेगाव, वाकोद दरेगाव दरी, कान्हेगाव, अडगाव खुर्द येथील उपसरपंच पदावर ही भाजप व शिवसेनेच्यावतीने दावेदारी ठोकली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच