शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ग्रामपंचायत निवडणुकीत धमाल; अनेक गावच्या सरपंच पदावर तीन पक्षांनी ठोकली दावेदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 16:55 IST

निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला.

ठळक मुद्देगावगाड्याचा आकडा वाढविण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ

फुलंब्री तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतीमध्ये हेच चित्र दिसून येत आहे

फुलंब्री : तालुक्यातील सरपंच पदाची संख्या वाढविण्यासाठी आणि सर्वाधिक गावातील सत्ता आपल्याच पक्षाच्या हाती मिळावी म्हणून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. धामणगावच्या सरपंचपदावर तर चक्क शिवसेना, भाजपा व कॉंग्रेसच्यावतीने दावा करण्यात आला. मुळात धामणगावच्या सरपंचांना व सदस्यांना राजकीय पक्षाच्या या केविलवाणी दाव्याची माहितीदेखील नाही. त्यामुळे धामणगावावर नेमकी सत्ता तरी कोणाची, हा प्रश्न निरुत्तरच आहे.

तालुक्यात नुकत्याच ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. यात चार ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तर ४९ ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. निकाल लागताच आमच्याच पक्षाचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा भाजपा, कॉंग्रेस, शिवसेनेला केला. या सर्वांची गोळाबेरीज लावली असता तालुक्यात असलेल्या सदस्य संख्येपेक्षा जास्तीचा आकडा होऊ लागला आहे. दरम्यान सरपंचपदाच्या निवडणुका झाल्या. आता या सरपंच पदावरही तिन्ही पक्षांच्यावतीने वेगवेगळे दावे केले जात आहेत. असे असले तरी जनतेला सत्य काय आहे, याची जाणीव तर आहेच. धामणगाव येथील सरपंचपदी सरसाबाई डिडोरे यांची निवड झाली. त्या आमच्याच पक्षाच्या सरपंच आहेत, असा दावा भाजप व शिवसेनेकडून पत्रकाद्वारे केला आहे, तर कॉंग्रेस पक्षाच्यावतीने तोंडी दावा केला आहे. वास्तविक अनेक गावात पॅनल तयार करताना विविध पक्षाशी निगडित उमेदवार घेतले गेले आहे. गावातील राजकारण वेगळे असते. सरपंचपद देताना काही ठिकाणी अडीच वर्षांची तडजोड करण्यात आली आहे. गावगाड्याच्या राजकारणात बहुतांश ठिकाणी पक्षाचा फारसा विचार केला गेला नाही. अशा परिस्थितीतदेखील राजकीय पक्षांची दावेदारी केविलवाणीच म्हणावी लागेल.

या गावांवर केला विविध पक्षांनी दावातालुक्यातील सुलतानवाडी, धामणगाव, सोनारी, दरेगाव दरी, सांजूळ या पाच ग्रामपंचायतमध्ये आमचाच सरपंच असल्याचा दावा शिवसेना व भाजपाच्यावतीने करण्यात आला. दोन्ही पक्षांच्या तालुका अध्यक्षांनी पक्षाच्या लेटरहेडवर अशा प्रकरचे परिपत्रक काढून या गावाचा सरपंच आमच्या पक्षाचा असल्याचे जाहीर करून टाकले. यासंदर्भात त्यांनी प्रत्यक्षात सरपंच, उपसरपंच यांच्यासोबत चर्चादेखील केली नाही. केवळ गावगाड्याची संख्या वाढविण्यासाठी असे फंडे वापरले जाऊ लागले आहेत. शिवाय महाल किन्होळा, साताळ पिंप्री, वाणेगाव, वाकोद दरेगाव दरी, कान्हेगाव, अडगाव खुर्द येथील उपसरपंच पदावर ही भाजप व शिवसेनेच्यावतीने दावेदारी ठोकली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादgram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच