शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

सावरगावात भरला भक्तीचा मळा

By admin | Updated: August 8, 2016 00:40 IST

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथील नागोबा यात्रेचा रविवारी अखेरचा दिवस. गण भाकणूक, पालखी मिरवणूक आदी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत या यात्रेची सांगता झाली. लिंबाऱ्याच्या माळा गळ्यात घालून ‘नागनाथ महाराज की जय’ असा जयघोष करीत भाविकांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता. आषाढ अमावस्येपासून सावरगाव येथे नागोबा यात्रेला प्रारंभ झाला. सलग पाच दिवस साप-पाल-विंचू हे प्राणी एकत्रित राहतात हे या यात्रेचे खास वैशिष्ट्य आहे. त्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी होती. रविवारी दुपारी ३ वाजता पुजारी कल्याण स्वामी यांच्या घरापासून गण पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मारुती मंदिरात संजय कोळी या मानकऱ्यांच्या हस्ते पुजारी कल्याण स्वामी यांना अंघोळ घालून टाळ-मृदंगाच्या गजरात गण मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी सहा वाजता मिरवणूक मंदिराजवळ आल्यानंतर कल्लोळात पुजारी स्वामी यांना स्नान घालून भाकणूक कार्यक्रमासाठी आणण्यात आले. यावेळी मंदिरालगत ओठ्यावर मानकरी केशव डोके यांनी खरीप रब्बी हंगामातील धान्याचे ढिगारे मांडले होते. कल्याण स्वामी यांनी धान्यास स्पर्श करून गहू, ज्वारी, साली, मिरची, हरभरा या धान्य पिकांचे उत्पादन वाढेल व पर्जन्यमान भरपूर राहणार असल्याचे भाकित केले. पंचारतीने यात्रेची सांगता झाली. मिरवणुकीत भजनी मंडळ, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांबरोबरच तुळजापूर व सोलापूर जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी आले होते. सावरगाव येथील क्लासमेट ग्रुपच्या वतीने भाविकांना लाडू व थंड पाण्याचे वाटप केले. यात्रास्थळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सपोनि मिर्झा बेग यांनी ३५ पोलीस कर्मचारी, दोन अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात केले होते. तुळजापूर आगाराच्या वतीने जादा बसेसचीही सोय करण्यात आली होती. बसस्थानक ते नागोबा मंदिरपर्यंतचा परिसर भाविकांचे गर्दीने फुलून गेला होता. यात्रा काळात सावरगाव आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एल. तेलंग यांनी आरोग्य पथक तैनात ठेवले होते. (वार्ताहर)