शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 14:34 IST

शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : जनार्दन महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज हे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता असून, तसे झाल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात.

यापूर्वी २००९मध्ये त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा लढविली होती. त्या निवडणुकीत एक लाख ४८ हजार मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतीगिरी महाराज रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली होती. त्या निवडणुकीत खैरे यांचा केवळ ३३ हजार १४ मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वीच्या, २००४ च्या निवडणुकीत खैरे यांना ५२.४ टक्के मते मिळाली होती, मात्र शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे २००९च्या निवडणुकीत खैरे यांच्या मतांची टक्केवारी ४२.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. शांतीगिरी महाराजांचे वलय २००९च्या निवडणुकीनंतर वाढत गेले. त्यांना राज्यातील विविध पक्षांची बडी मंडळी भेटायला जाऊ लागली.स्थानिक नेते तर त्यांना भेटतच असतात, परंतु छत्रपती संभाजी राजे, तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी मंडळीही त्यांना भेटून गेलेली आहे. नजीकच्या काळात विश्वशांती संमेलन आयोजित करण्यात येणार असून, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा मानस आहे.

शिष्यांनीच ठरवले आहे...महाराजांच्या वेरूळ येथील आश्रमात एका भेटीत ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात, ही बाब स्पष्ट झाली. शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे. त्यातही औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे. १०८ आश्रम, दहा गुरुकुल, शेकडो एकर जमीन असा मोठा व्याप आहे. श्रमदानाला प्रचंड महत्त्व देणारे शांतिगिरी महाराज म्हणाले, ‘मी निवडणूक लढवतो की नाही, यापेक्षा आमच्या भक्त, भाविकांनी व शिष्यांनीच तसे ठरवले आहे. मागच्या काही निवडणुकांमध्ये आम्ही अनेक उमेदवारांना भरपूर मदत केली आहे. हे पाहता खरे तर आम्हाला बिनविरोधच संसदेत पाठवायला हवे. तेथे जाऊन आम्हाला देशाची सेवा करायची आहे. जनतेची नि:स्वार्थ सेवा करायची आहे.’

औरंगाबाद किंवा नाशिकमतदारसंघ अद्याप निश्चित केला नाही. औरंगाबाद किंवा नाशिक यापैकी एक मतदारसंघ निवडला जाईल. शिष्यगण नाशिकला अधिक प्राधान्य देत आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांतीगिरी महाराजांनी प्रशंसा केली. परमात्माच त्यांच्याकरवी चांगली कामे करवून घेत आहे, असे मला तरी वाटते. राममंदिर होईल, ही स्वप्नपूर्ती त्यांच्यामुळे शक्य होत आहे. ३७० कलम त्यांच्या भूमिकेमुळे हटले. आता त्यांनी समान नागरी कायदा करून टाकावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचे हिंदुत्व खरे...परधन, परस्त्री, परनिंदा व परअन्न यांचा त्याग करण्याची गरज आहे. आज नेमके याच्या विरुद्ध घडत आहे, याबद्दलची चिंता महाराजांनी व्यक्त केली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वानुसार आज जो वागतोय, तो खरा हिंदुत्ववादी.’ महाराजांचा हा सूचक इशारा फार बोलका आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकPoliticsराजकारण