शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 14:34 IST

शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : जनार्दन महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज हे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता असून, तसे झाल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात.

यापूर्वी २००९मध्ये त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा लढविली होती. त्या निवडणुकीत एक लाख ४८ हजार मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतीगिरी महाराज रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली होती. त्या निवडणुकीत खैरे यांचा केवळ ३३ हजार १४ मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वीच्या, २००४ च्या निवडणुकीत खैरे यांना ५२.४ टक्के मते मिळाली होती, मात्र शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे २००९च्या निवडणुकीत खैरे यांच्या मतांची टक्केवारी ४२.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. शांतीगिरी महाराजांचे वलय २००९च्या निवडणुकीनंतर वाढत गेले. त्यांना राज्यातील विविध पक्षांची बडी मंडळी भेटायला जाऊ लागली.स्थानिक नेते तर त्यांना भेटतच असतात, परंतु छत्रपती संभाजी राजे, तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी मंडळीही त्यांना भेटून गेलेली आहे. नजीकच्या काळात विश्वशांती संमेलन आयोजित करण्यात येणार असून, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा मानस आहे.

शिष्यांनीच ठरवले आहे...महाराजांच्या वेरूळ येथील आश्रमात एका भेटीत ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात, ही बाब स्पष्ट झाली. शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे. त्यातही औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे. १०८ आश्रम, दहा गुरुकुल, शेकडो एकर जमीन असा मोठा व्याप आहे. श्रमदानाला प्रचंड महत्त्व देणारे शांतिगिरी महाराज म्हणाले, ‘मी निवडणूक लढवतो की नाही, यापेक्षा आमच्या भक्त, भाविकांनी व शिष्यांनीच तसे ठरवले आहे. मागच्या काही निवडणुकांमध्ये आम्ही अनेक उमेदवारांना भरपूर मदत केली आहे. हे पाहता खरे तर आम्हाला बिनविरोधच संसदेत पाठवायला हवे. तेथे जाऊन आम्हाला देशाची सेवा करायची आहे. जनतेची नि:स्वार्थ सेवा करायची आहे.’

औरंगाबाद किंवा नाशिकमतदारसंघ अद्याप निश्चित केला नाही. औरंगाबाद किंवा नाशिक यापैकी एक मतदारसंघ निवडला जाईल. शिष्यगण नाशिकला अधिक प्राधान्य देत आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांतीगिरी महाराजांनी प्रशंसा केली. परमात्माच त्यांच्याकरवी चांगली कामे करवून घेत आहे, असे मला तरी वाटते. राममंदिर होईल, ही स्वप्नपूर्ती त्यांच्यामुळे शक्य होत आहे. ३७० कलम त्यांच्या भूमिकेमुळे हटले. आता त्यांनी समान नागरी कायदा करून टाकावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचे हिंदुत्व खरे...परधन, परस्त्री, परनिंदा व परअन्न यांचा त्याग करण्याची गरज आहे. आज नेमके याच्या विरुद्ध घडत आहे, याबद्दलची चिंता महाराजांनी व्यक्त केली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वानुसार आज जो वागतोय, तो खरा हिंदुत्ववादी.’ महाराजांचा हा सूचक इशारा फार बोलका आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकPoliticsराजकारण