शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

भक्त, भाविक, शिष्यांचे ठरले; शांतीगिरी महाराज पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 14:34 IST

शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : जनार्दन महाराजांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज हे आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता असून, तसे झाल्यास राजकीय समीकरणे बदलू शकतात.

यापूर्वी २००९मध्ये त्यांनी शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा लढविली होती. त्या निवडणुकीत एक लाख ४८ हजार मते मिळवून ते तिसऱ्या क्रमांकावर होते. शांतीगिरी महाराज रिंगणात उतरल्यामुळे निवडणुकीची समीकरणे बदलली होती. त्या निवडणुकीत खैरे यांचा केवळ ३३ हजार १४ मतांनी विजय झाला होता. त्यापूर्वीच्या, २००४ च्या निवडणुकीत खैरे यांना ५२.४ टक्के मते मिळाली होती, मात्र शांतीगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे २००९च्या निवडणुकीत खैरे यांच्या मतांची टक्केवारी ४२.८ टक्क्यांपर्यंत कमी झाली होती. शांतीगिरी महाराजांचे वलय २००९च्या निवडणुकीनंतर वाढत गेले. त्यांना राज्यातील विविध पक्षांची बडी मंडळी भेटायला जाऊ लागली.स्थानिक नेते तर त्यांना भेटतच असतात, परंतु छत्रपती संभाजी राजे, तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखी मंडळीही त्यांना भेटून गेलेली आहे. नजीकच्या काळात विश्वशांती संमेलन आयोजित करण्यात येणार असून, त्यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा मानस आहे.

शिष्यांनीच ठरवले आहे...महाराजांच्या वेरूळ येथील आश्रमात एका भेटीत ते लोकसभेचे संभाव्य उमेदवार असू शकतात, ही बाब स्पष्ट झाली. शांतीगिरी महाराजांचा शिष्यवर्ग महाराष्ट्रभर विखुरला आहे. त्यांच्या भक्तांची व शिष्यांची संख्या २० लाखांहूनही अधिक आहे. त्यातही औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ही संख्या मोठी आहे. १०८ आश्रम, दहा गुरुकुल, शेकडो एकर जमीन असा मोठा व्याप आहे. श्रमदानाला प्रचंड महत्त्व देणारे शांतिगिरी महाराज म्हणाले, ‘मी निवडणूक लढवतो की नाही, यापेक्षा आमच्या भक्त, भाविकांनी व शिष्यांनीच तसे ठरवले आहे. मागच्या काही निवडणुकांमध्ये आम्ही अनेक उमेदवारांना भरपूर मदत केली आहे. हे पाहता खरे तर आम्हाला बिनविरोधच संसदेत पाठवायला हवे. तेथे जाऊन आम्हाला देशाची सेवा करायची आहे. जनतेची नि:स्वार्थ सेवा करायची आहे.’

औरंगाबाद किंवा नाशिकमतदारसंघ अद्याप निश्चित केला नाही. औरंगाबाद किंवा नाशिक यापैकी एक मतदारसंघ निवडला जाईल. शिष्यगण नाशिकला अधिक प्राधान्य देत आहेत, असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांतीगिरी महाराजांनी प्रशंसा केली. परमात्माच त्यांच्याकरवी चांगली कामे करवून घेत आहे, असे मला तरी वाटते. राममंदिर होईल, ही स्वप्नपूर्ती त्यांच्यामुळे शक्य होत आहे. ३७० कलम त्यांच्या भूमिकेमुळे हटले. आता त्यांनी समान नागरी कायदा करून टाकावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बाळासाहेबांचे हिंदुत्व खरे...परधन, परस्त्री, परनिंदा व परअन्न यांचा त्याग करण्याची गरज आहे. आज नेमके याच्या विरुद्ध घडत आहे, याबद्दलची चिंता महाराजांनी व्यक्त केली. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वानुसार आज जो वागतोय, तो खरा हिंदुत्ववादी.’ महाराजांचा हा सूचक इशारा फार बोलका आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादElectionनिवडणूकPoliticsराजकारण