शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मागासवर्गीयांच्या २०५२ वस्त्यांमध्ये ३४६ कोटींची विकासकामे प्रस्तावित, बहृत आराखड्यावर अखेर शिक्कामोर्तब

By विजय सरवदे | Updated: February 29, 2024 18:44 IST

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ही योजना राबविली जाते

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी आगामी पाच वर्षांच्या बृहत आराखड्यावर अखेर समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त व जि. प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्कामोर्तब केले. या योजनेअंतर्गत आगामी पाच वर्षांत जिल्ह्यातील २०५२ वस्त्यांमध्ये ३४६ कोटींची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींचा विकास ही योजना राबविली जाते. यासाठी सन २०२३-२४ ते २०२७-२८ या पाच वर्षांचा बृहत आराखडा तयार करण्याची प्रक्रिया जुनपासून सुरू झाली होती. बारीक सारीक बारकावे दुरूस्त केल्यानंतर आता कुठे या आराखड्यास अंतिम मान्यता मिळाली. आराखड्यात मागील पाच वर्षांच्या काळात या घटकांची लोकसंख्या वाढ, नवीन वस्त्या, आतापर्यंत राबविण्यात आलेली कामे, खर्च झालेला निधी, यापुढील पाच वर्षांत प्राधान्याने कोणती विकासकामे अपेक्षित आहेत, या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे.

चेहरामोहरा बदलणारया आराखड्यात पुढील पाच वर्षांत मागासवर्गीय वस्तींमधील विविध कामांसाठी सुमारे ३४६ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. या योजनेतून जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींच्या हद्दीतील २ हजार ५२ मागासवर्गीय वस्त्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे.

कोणती कामे प्रस्तावितजिल्ह्यातील ग्रामीण भागात मागासवर्गीय वस्त्यांमध्ये पाच वर्षात समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, पोहोच रस्ते, पाणीपुरवठा, अंतर्गत गटारी, पेव्हर ब्लॉक, मलनिःसारण, पथदिवे आदी विकासकामे प्रस्तावित आहेत. ग्रामपंचायतींनी वर्षनिहाय कोणती कामे करायची, त्याचा प्राधान्यक्रम ग्रामसभेत निश्चित केला आहे.

राज्यात पहिलाच प्रयोगया योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांएवेजी प्राप्त निधीतून दुसऱ्याच ठिकाणी कामे केल्याच्या तक्रारी होत्या. यापुढे याच वस्त्यांमध्ये ही कामे राबविण्यात यावीत, यासाठी संपूर्ण २०५२ वस्त्यांचे ‘जिओ टॅगिंग’ करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच हा प्रयोग झाल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ओमप्रसाद रामावत यांनी सांगितले.

वाढीव निधीनुसार आराखडाजि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी सांगितले की, आता या योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकासकामांवर पूर्वीपेक्षा दुप्पट निधी खर्च करण्याचा शासननिर्णय आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी दुप्पट निधीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सन २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी ६० कोटींचा निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद