शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या तीन नियोजन प्राधिकरणामुळे औरंगाबादच्या विकासाला खीळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 14:21 IST

एकाच शहरात तीन वेगवेगळे नियोजन प्राधिकरण शासनाने नियुक्त करून ठेवले आहेत.

ठळक मुद्दे तीन नियोजन प्राधिकरण अस्तित्वात एका बांधकामाला लागते दोन शासकीय संस्थांची परवानगीतिन्ही प्राधिकरण दामटतात आपापल्या नियमांचे घोडे

औरंगाबाद : मागील काही वर्षांपासून शहराच्या विकासाला चांगलीच खीळ बसली आहे. एकाच शहरात तीन वेगवेगळे नियोजन प्राधिकरण शासनाने नियुक्त करून ठेवले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना, गुंतवणूकदारांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो. छोट्या-छोट्या कामांसाठी नागरिकांना दोन वेगवेगळ्या प्राधिकरणांची परवानगी घ्यावी लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.

संपूर्ण शहराला एकच नियोजन प्राधिकरण असावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शासन दरबारी या मागणीकडे फारसे गांभीर्याने घेतले नाही, हे विशेष. १९८० च्या दशकात आशिया खंडात सर्वाधिक झपाट्याने वाढणारे शहर म्हणून ख्याती मिळविलेल्या औरंगाबाद शहराची आजची दशा आणि दिशा बरीच निराळी आहे. मागील ३० वर्षांमध्ये शहराने अनेक चढउतार बघितले. मात्र, विकासाच्या कक्षा ज्या पद्धतीने रुंद व्हायला हव्या होत्या, तशा अजिबात झालेल्या नाहीत. याला वेगवेगळी कारणे असल्याचे आता समोर येत आहे. ८० च्या दशकात नगर परिषदेनंतर महापालिकेची स्थापना करण्यात आली. याच दशकात सिडको हे स्वतंत्र प्राधिकरण शहरात आणण्यात आले. 

त्यापूर्वी एमआयडीसी आणण्यात आली होती. आज तिन्ही प्राधिकरण आपापले नियम जपत बसले आहे. एमआयडीसी भागात बांधकाम करायचे असेल तर अगोदर या विभागाची एनओसी, त्यानंतर महापालिकेची बांधकाम परवानगी घ्यावी लागते. सिडकोत राहणाऱ्यांनाही हाच नियम लागू होतो. महापालिकाच अंतिम बांधकाम परवानगी देणार असेल तर इतर विभागांकडे कशासाठी जायचे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येतो.

गगनचुंबी इमारती का नाहीत?राज्यातील इतर मोठ्या शहरांप्रमाणेच औरंगाबादेत बांधकाम नियमावली ठरवून दिली आहे. मात्र, शहरात गगनचुंबी इमारती उभ्या राहत नाहीत. पाच मजल्यापेक्षा मोठे बांधकाम सहजासहजी होत नाही. कमी जागेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा यादृष्टीने शासनाने बांधकाम नियमावली शिथिल करून एफएसआय, टीडीआर वापरण्याची मुभा दिली आहे. या परिस्थितीला महापालिकाच जबाबदार असल्याचा ठपका बांधकाम व्यावसायिकांकडून ठेवण्यात येतो. मागील सहा महिन्यांपासून टीडीआर लोड करणे बंद आहे. याला महापालिकेचा कारभारच कारणीभूत आहे.

आॅनलाईन नाहरकत प्रमाणपत्र द्यावेविमानतळाच्या आसपास एखाद्या नागरिकाला घर बांधायचे असेल तर विमानतळ प्राधिकरणाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. प्राधिकरणाने मागील काही वर्षांपासून एनओसीची प्रक्रिया आॅनलाईन केली आहे. कोणत्या भागात किती मजली इमारत उभी करता येईल, हे नाहरकत प्रमाणपत्रात नमूद करण्यात येते. अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत एनओसी प्राप्त होते. सिडको, एमआयडीसीनेही आॅनलाईन नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, त्याची लिंक महापालिकेला द्यावी.

बांधकाम परवानगीचे नियम इतरत्र नाहीत

शहरात बांधकाम परवानगीसाठी असलेले नियम सिडको, एमआयडीसी भागात लागू होत नाहीत. सिडकोत विकासाला बरीच मुभा आहे. या भागात महापालिका ३० टक्के प्रीमियम देत नाही. वाढीव एफएसआयही सिडको प्रशासन देत नाही. सातारा-देवळाईतही ‘ड’ वर्ग महापालिकेच्या नियमावलीची अंमलबजावणी होत नाही. शहर विकास नियमावलीनुसार सध्या २४ मीटरपर्यंत इमारती उभ्या राहतात. शहराला ५० मीटर उंच इमारती उभारण्याची मुभा शहर विकास नियमावलीने दिलेली आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाState Governmentराज्य सरकारAurangabadऔरंगाबाद