शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

विकास आराखड्याचे पाप भाजपचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:44 IST

शहर विकास आराखडा मागील काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, असे म्हणत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सेनेच्या कारभारावर रविवारी स्मार्ट बसच्या लोकार्पणप्रसंगी तोफ डागली होती

ठळक मुद्देमहापौरांचा पलटवार : मनपात फक्त सेनेची सत्ता नाही

औरंगाबाद : शहर विकास आराखडा मागील काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, असे म्हणत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सेनेच्या कारभारावर रविवारी स्मार्ट बसच्या लोकार्पणप्रसंगी तोफ डागली होती. याला महापौर नंदकुमार घोडेले यांनी पलटवार केला असून, त्यांनी शहर विकास आराखडा हे भाजपचेच पाप असल्याचे सांगितले. आराखड्यात गुंतलेले कोण? याचा बागडे यांनी अभ्यास करावा, असेही त्यांनी नमूद केले.महापालिकेत फक्त शिवसेनेचीच सत्ता नाही. भाजपही सत्तेत सहभागी आहे. कोणतेही आरोप करताना एकट्या सेनेला जबाबदार धरणे योग्य नाही. सत्तेचा उपभोग घेताना चांगले आणि वाईट याची जबाबदारी युतीची आहे. मागील चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याचे प्रकरण प्रलंबित आहे. भाजपचे बापू घडमोडे महापौर असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याचे प्रकरण सुरू राहण्यासाठी शपथपत्र सादर केले होते. घडमोडे यांनी त्याचवेळी शपथपत्र दाखल करून विकास आराखड्याची याचिका मागे का घेतली नाही. विकास आराखड्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, ही वस्तुस्थिती आहे. डिसेंबर महिन्यात आराखड्याची सुनावणी असताना सेनेने पक्षाचे मार्गदर्शन मागवून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे महापौर म्हणून या प्रकरणात मला भूमिका मांडता आलेली नाही. योग्य वेळी सेना शहर विकासासाठी चांगलाच निर्णय घेणार आहे. आराखड्याचे पाप सेनेचे आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कराबाबत खुलासा करताना बागडे यांनी फक्त २८ लाख सुधारित कर लागल्याचे सांगितले होते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाजार समितीला २ कोटी ५८ लाखांचा कर लागलेला आहे. उर्वरित रक्कम कोल्ड स्टोरेज, वीज कंपनी आदींमध्ये विभागून दिली आहे. ११ कोटींचा कर २८ लाखांवर आला हे म्हणणेही निरर्थक आहे.काय म्हणाले होते बागडे?विकास आराखडा रखडल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे. जिकडे तिकडे २० बाय ३० ची प्लॉटिंग सुरू आहे. नागरिकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळत नाहीत. मालमत्ता कराची वसुली फक्त १८ टक्के आहे. घनकचऱ्यासाठी मनपाला राज्य शासनाने निधी दिला, त्याचा आजपर्यंत उपायोग करता आला नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या कामातही सेना नेते लुडबुड करतात. निविदा काढण्यास विलंब का होत आहे, असा जाबही बागडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर विचारला होता.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे