शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

विकास आराखड्याचे पाप भाजपचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:44 IST

शहर विकास आराखडा मागील काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, असे म्हणत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सेनेच्या कारभारावर रविवारी स्मार्ट बसच्या लोकार्पणप्रसंगी तोफ डागली होती

ठळक मुद्देमहापौरांचा पलटवार : मनपात फक्त सेनेची सत्ता नाही

औरंगाबाद : शहर विकास आराखडा मागील काही वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, असे म्हणत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सेनेच्या कारभारावर रविवारी स्मार्ट बसच्या लोकार्पणप्रसंगी तोफ डागली होती. याला महापौर नंदकुमार घोडेले यांनी पलटवार केला असून, त्यांनी शहर विकास आराखडा हे भाजपचेच पाप असल्याचे सांगितले. आराखड्यात गुंतलेले कोण? याचा बागडे यांनी अभ्यास करावा, असेही त्यांनी नमूद केले.महापालिकेत फक्त शिवसेनेचीच सत्ता नाही. भाजपही सत्तेत सहभागी आहे. कोणतेही आरोप करताना एकट्या सेनेला जबाबदार धरणे योग्य नाही. सत्तेचा उपभोग घेताना चांगले आणि वाईट याची जबाबदारी युतीची आहे. मागील चार वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याचे प्रकरण प्रलंबित आहे. भाजपचे बापू घडमोडे महापौर असताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयात विकास आराखड्याचे प्रकरण सुरू राहण्यासाठी शपथपत्र सादर केले होते. घडमोडे यांनी त्याचवेळी शपथपत्र दाखल करून विकास आराखड्याची याचिका मागे का घेतली नाही. विकास आराखड्यामुळे शहराचा विकास थांबला आहे, ही वस्तुस्थिती आहे. डिसेंबर महिन्यात आराखड्याची सुनावणी असताना सेनेने पक्षाचे मार्गदर्शन मागवून योग्य तो निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुनावणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे महापौर म्हणून या प्रकरणात मला भूमिका मांडता आलेली नाही. योग्य वेळी सेना शहर विकासासाठी चांगलाच निर्णय घेणार आहे. आराखड्याचे पाप सेनेचे आहे, हे म्हणणे चुकीचे आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कराबाबत खुलासा करताना बागडे यांनी फक्त २८ लाख सुधारित कर लागल्याचे सांगितले होते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. बाजार समितीला २ कोटी ५८ लाखांचा कर लागलेला आहे. उर्वरित रक्कम कोल्ड स्टोरेज, वीज कंपनी आदींमध्ये विभागून दिली आहे. ११ कोटींचा कर २८ लाखांवर आला हे म्हणणेही निरर्थक आहे.काय म्हणाले होते बागडे?विकास आराखडा रखडल्याने शहराचा विकास ठप्प झाला आहे. जिकडे तिकडे २० बाय ३० ची प्लॉटिंग सुरू आहे. नागरिकांना दर्जेदार सोयी-सुविधा मिळत नाहीत. मालमत्ता कराची वसुली फक्त १८ टक्के आहे. घनकचऱ्यासाठी मनपाला राज्य शासनाने निधी दिला, त्याचा आजपर्यंत उपायोग करता आला नाही. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याच्या कामातही सेना नेते लुडबुड करतात. निविदा काढण्यास विलंब का होत आहे, असा जाबही बागडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासमोर विचारला होता.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाHaribhau Bagadeहरिभाऊ बागडे