शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध

By मुजीब देवणीकर | Updated: March 7, 2024 12:43 IST

१९९१ नंतर आला दुसरा विकास आराखडा

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३३ वर्षांपासून रखडलेला शहर विकास आराखडा शासन नियुक्त विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी बुधवारी रात्री अचानक महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना सादर केला. गुरुवारी हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल. शहर विकासाचा हा रोडमॅप मागील आठ वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत अडकला होता.

जुने शहर आणि दुसरा शहराची वाढीव हद्द अशा दोन विकास आराखड्याचा वापर सध्या महापालिकेत होतो. याशिवाय सिडको, एमआयडीसीने नियोजन प्राधिकरण म्हणून स्वतंत्र विकास आराखडे तयार केले आहेत. २००१ मध्ये शहराच्या वाढीव हद्दीनंतर कोणताही आराखडा तयार झाला नाही. २०१५-१६ मध्ये शासनाने विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. लोकप्रतिनिधींनी आराखड्याच्या नियमांचे पालन न केल्याने यासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शासनाने शहराचा जुना आणि नवीन विकास आराखडा एकत्रित तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार नगररचना अधिकारी रजा खान यांच्या नेतृत्वाखाली विशेष डीपी युनिटची स्थापना केली. त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करून प्रशासकांना सादर कला होता. प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम या युनिट मार्फत सुरू असताना शासनाने विशेष अधिकारी म्हणून श्रीकांत देशमुख यांची नियुक्ती केली. अजूनही सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात खटला सुरू आहे.

देशमुख यांनी प्रारूप विकास आराखडा तयार केला. त्यांनी बुधवारी रात्री प्रारूप विकास आराखड्याच्या प्रती महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना सुपूर्द केल्या. यावेळी शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपसंचालक नगररचना मनोज गर्जे, उपायुक्त सोमनाथ जाधव, नंदा गायकवाड, कार्यकारी अभियंता के. एम. फालक, डीपी युनिटची टीम व इतर अधिकारी उपस्थित होते.

शहराला मिळेल नवीन दिशाविकास आराखडा स्वीकारल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, एवढे वर्षे शहराचा विकास आराखडा रखडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या विलंबामुळे शहराचा विकास दिशाहीन झाला होता. आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, ही बाबसुद्धा शहरासाठी दुर्दैवी आहे. प्रारूप विकास आराखड्यामुळे शहराला नवीन दिशा मिळेल. कोणताही विकास आराखडा सर्वांना खूश करणारा नसतो.

सूचना, हरकती मागविणारशासन नियुक्त अधिकारी व त्यांच्या टीमने सीलबंद लिफाफ्यात आराखडा आणि अहवाल दाेन प्रतीत सादर केला. मनपा मुख्यालयात हा आराखडा प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत.

अशी बसली होती विकासाला खीळशहराचा विकास आराखडा तयार होत नसल्याने अनेक मोठे गृहप्रकल्प रखडले होते. ८ वर्षांपासून आरक्षणे, रस्ते, रुंदीकरणाला ब्रेक लागला होता. शहराच्या चारही बाजूने नियोजन नसलेल्या वसाहतींचे जाळे वाढू लागले. सार्वजनिक वापरासाठी कुठेही जागा मिळत नव्हत्या. नवीन विकास आराखड्यात अनेक समस्या मार्गी लागणार हे निश्चित.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका