शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अडथळ्यांची शर्यत संपली; छत्रपती संभाजीनगरचा विकास आराखडा ३३ वर्षांनंतर प्रसिद्ध

By मुजीब देवणीकर | Updated: March 7, 2024 12:43 IST

१९९१ नंतर आला दुसरा विकास आराखडा

छत्रपती संभाजीनगर : तब्बल ३३ वर्षांपासून रखडलेला शहर विकास आराखडा शासन नियुक्त विशेष अधिकारी श्रीकांत देशमुख यांनी बुधवारी रात्री अचानक महापालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना सादर केला. गुरुवारी हा आराखडा नागरिकांसाठी प्रसिद्ध करण्यात येईल. शहर विकासाचा हा रोडमॅप मागील आठ वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत अडकला होता.

जुने शहर आणि दुसरा शहराची वाढीव हद्द अशा दोन विकास आराखड्याचा वापर सध्या महापालिकेत होतो. याशिवाय सिडको, एमआयडीसीने नियोजन प्राधिकरण म्हणून स्वतंत्र विकास आराखडे तयार केले आहेत. २००१ मध्ये शहराच्या वाढीव हद्दीनंतर कोणताही आराखडा तयार झाला नाही. २०१५-१६ मध्ये शासनाने विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. लोकप्रतिनिधींनी आराखड्याच्या नियमांचे पालन न केल्याने यासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. दरम्यान, दोन वर्षांपूर्वी शासनाने शहराचा जुना आणि नवीन विकास आराखडा एकत्रित तयार करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार नगररचना अधिकारी रजा खान यांच्या नेतृत्वाखाली विशेष डीपी युनिटची स्थापना केली. त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये विद्यमान जमीन वापर नकाशा तयार करून प्रशासकांना सादर कला होता. प्रारूप विकास आराखडा तयार करण्याचे काम या युनिट मार्फत सुरू असताना शासनाने विशेष अधिकारी म्हणून श्रीकांत देशमुख यांची नियुक्ती केली. अजूनही सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात खटला सुरू आहे.

देशमुख यांनी प्रारूप विकास आराखडा तयार केला. त्यांनी बुधवारी रात्री प्रारूप विकास आराखड्याच्या प्रती महानगरपालिका प्रशासक जी. श्रीकांत यांना सुपूर्द केल्या. यावेळी शहर अभियंता ए. बी. देशमुख, उपसंचालक नगररचना मनोज गर्जे, उपायुक्त सोमनाथ जाधव, नंदा गायकवाड, कार्यकारी अभियंता के. एम. फालक, डीपी युनिटची टीम व इतर अधिकारी उपस्थित होते.

शहराला मिळेल नवीन दिशाविकास आराखडा स्वीकारल्यानंतर प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले की, एवढे वर्षे शहराचा विकास आराखडा रखडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या विलंबामुळे शहराचा विकास दिशाहीन झाला होता. आराखड्याचा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला, ही बाबसुद्धा शहरासाठी दुर्दैवी आहे. प्रारूप विकास आराखड्यामुळे शहराला नवीन दिशा मिळेल. कोणताही विकास आराखडा सर्वांना खूश करणारा नसतो.

सूचना, हरकती मागविणारशासन नियुक्त अधिकारी व त्यांच्या टीमने सीलबंद लिफाफ्यात आराखडा आणि अहवाल दाेन प्रतीत सादर केला. मनपा मुख्यालयात हा आराखडा प्रसिद्ध करण्यात येईल. नागरिकांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत.

अशी बसली होती विकासाला खीळशहराचा विकास आराखडा तयार होत नसल्याने अनेक मोठे गृहप्रकल्प रखडले होते. ८ वर्षांपासून आरक्षणे, रस्ते, रुंदीकरणाला ब्रेक लागला होता. शहराच्या चारही बाजूने नियोजन नसलेल्या वसाहतींचे जाळे वाढू लागले. सार्वजनिक वापरासाठी कुठेही जागा मिळत नव्हत्या. नवीन विकास आराखड्यात अनेक समस्या मार्गी लागणार हे निश्चित.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका