शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बळीराजाच्या मुलाचा निर्धार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३६ जिल्ह्यांतून काढली सायकल फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:07 IST

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाची किंमत ठरवू द्या, शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित मदत द्या, शेतकरी कर्जमुक्त करा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब बाबूराव कोळसे (रा. आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हा युवा शेतकरी ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सायकलने प्रवास करीत मंगळवारी औरंगाबादेत पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तो पुढील प्रवासाला रवाना झाला.

शेतकरी कर्ज काढून शेती करतात; मात्र पिकविलेल्या पिकांना बाजारात भाव मिळत नाही. यात तो कर्जबाजारी होऊन खचून जातो आणि आत्महत्येकडे वळतो. या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव ठरविण्याचे अधिकार असावेत, राज्य शासनाची सर्व नोकरभरती एमपीएससीमार्फत करावी आदी मागण्यांसाठी बाळासाहेब काेळसे यांनी त्यांच्या गावातून १३ ऑक्टोबरपासून सायकलने प्रवास सुरू केला. आतापर्यंत १७ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी निवेदने दिली. त्यांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. 

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढील प्रवासात आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देणार आहे. शेवटी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद