शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

बळीराजाच्या मुलाचा निर्धार; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३६ जिल्ह्यांतून काढली सायकल फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 16:07 IST

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद : शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाची किंमत ठरवू द्या, शासनाने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित मदत द्या, शेतकरी कर्जमुक्त करा, यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाळासाहेब बाबूराव कोळसे (रा. आडगाव, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) हा युवा शेतकरी ३६ जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यासाठी सायकलने प्रवास करीत मंगळवारी औरंगाबादेत पोहोचला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन तो पुढील प्रवासाला रवाना झाला.

शेतकरी कर्ज काढून शेती करतात; मात्र पिकविलेल्या पिकांना बाजारात भाव मिळत नाही. यात तो कर्जबाजारी होऊन खचून जातो आणि आत्महत्येकडे वळतो. या आत्महत्या थांबविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या मालाचे भाव ठरविण्याचे अधिकार असावेत, राज्य शासनाची सर्व नोकरभरती एमपीएससीमार्फत करावी आदी मागण्यांसाठी बाळासाहेब काेळसे यांनी त्यांच्या गावातून १३ ऑक्टोबरपासून सायकलने प्रवास सुरू केला. आतापर्यंत १७ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून त्यांनी निवेदने दिली. त्यांनी मंगळवारी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. 

शेतकऱ्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी आपला हा छोटासा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यापुढील प्रवासात आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देणार आहे. शेवटी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना भेटून शेतकऱ्यांच्या मागण्या सोडविण्यासाठी आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद