शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आता काय करावे? निवड होऊनही तलाठीपदावर नियुक्ती मिळेना; प्रशासन उमेदवारांना दाद देईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 13:22 IST

सर्वांचे कागदपत्र पडताळणी झालेली असतांना नियुक्ती मिळत नसल्याने पात्र उमदेवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाच्या आस्थापनेवरील तलाठी पदावर लोकसभा निवडणुकीपूर्वी निवड होऊनही सुमारे ८७ उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिलेली नाही. स्वातंत्र्यदिनी पाच उमेदवारांना नियुक्ती दिली. मात्र, उर्वरित सर्व तलाठ्यांना प्रशासनाने ताटकळत ठेवले आहे. नियुक्तीबाबत असलेले कायदेशीर अडथळे दूर झाले आहेत. इतर सर्व जिल्ह्यांत नियुक्ती झाली. काही जिल्ह्यांत तर प्रतीक्षा यादी लागली आहे. संभाजीनगरात कायदेशीर अडथळा नसतानाही नियुक्ती दिलेली नाही. सर्वांचे कागदपत्र पडताळणी झालेली असतांना नियुक्ती मिळत नसल्याने पात्र उमदेवारांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

फक्त पाच नियुक्ता दिल्यासंभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने १५ ऑगस्ट रोजी गणेश नारायणकर, रूपाली गवळी, पल्लवी राऊत, सुरेश मस्के, सुधाकर कासार या पाच उमेदवारांना नियुक्त्या दिल्या. सुमारे ८७ उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मागील काही महिन्यांपासून ते खेटे मारत आहेत. परंतु त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

उमेदवारांमध्ये रोषआधी परीक्षा द्यायच्या, त्यात उत्तीर्ण व्हायचं आणि त्यानंतर नियुक्तीसाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारायचे, आंदोलन आणि उपोषण करायचे, अशी परिस्थिती उमेदवारांवर आली आहे. येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल. त्यामुळे नियुक्ती पुन्हा रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उमेदवार काय म्हणतात

निवड होऊन सहा महिने झाले, तरीही प्रशासन नियुक्तीपत्र देत नाही. वरिष्ठ अधिकारी आम्हाला भेटत नाहीत.- उमेदवार

पाच जणांनाच का नियुक्ती दिली, बाकीच्या उमेदवारांना नियुक्ती का दिली नाही. यावर जिल्हा प्रशासनातील अधिकारी बोलत नाहीत.- उमेदवार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग