शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरही पंचनामे रखडले

By admin | Updated: June 8, 2014 00:54 IST

पाटोदा: तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले होते.

पाटोदा: तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने अनेकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. यानंतरही पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.पाटोदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झाले होते. या नुकसानीचे योग्य पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांना मदत मिळाली नव्हती. यामुळे सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ देशमुख, कॉ. महादेव नागरगोजे, विष्णूपंत घोलप आदींनी उपोषण केले होते. या उपोषणकर्त्यांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पंचनाम्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यालाही महिना लोटला व अद्यापही पंचनामे झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. येथे पंचनामे करण्यासाठीही तालुका कृषी अधिकारी बिनवडे हजर नसतात. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशातच एक तारखेपासून ते रजेवर आहेत. त्यामुळे आता पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणेही जिकिरीचे झाले आहे. यामुळे येथील पंचनाम्यास उशीर करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशच अद्याप मिळाले नसल्याचे तालुका कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी खासगीत सांगतात. या संदर्भात तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांचा संपर्क होऊ शकला नाही. तर जिल्हा कृषी अधीक्षक मुळे म्हणाले की, पुन्हा सर्व्हे करण्याचे आदेश अद्यापही मिळालेले नाहीत. त्यामुळे पंचनामे झालेले नाहीत. तसेच येथे ता.कृ.अ. बिनवडे यांना कायम करण्यात येईल.(वार्ताहर)