शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आखाड तळण्यासाठी करडी तेलावर मदार; भाव स्थिर; पण तेलकट टाळा!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 18, 2024 20:29 IST

तळण्यासाठी करडी तेलाचा जास्त वापर केला जातो. यामुळे सध्या बाजारात करडी तेलाची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे.

छत्रपती संभाजीनगर : आषाढ महिन्यात तळलेले पदार्थ खाणे, यालाच आखाड तळणे असे म्हणतात. या काळात तिखट पुरी, गोड पुरी, शंकरपाळे घरोघरी केले जातात. त्याचा नैवेद्य देवीला दाखविला जातो. त्यानंतर घरातील सर्व जण हे तेलकट पदार्थ चवीने खातात. तळण्यासाठी करडी तेलाचा जास्त वापर केला जातो. यामुळे सध्या बाजारात करडी तेलाची मागणी २० टक्क्यांनी वाढली आहे. अन्य खाद्यतेलापेक्षा महाग असले तरी करडी तेल आर्वजून खरेदी केले जात आहे.

खाद्यतेलाचे भावतेलाचा प्रकार किंमत (प्रति लीटर पॅकिंग)१) करडी तेल---- १८० रु२) शेंगदाणा तेल---- १७५ रु३) सूर्यफूल तेल---- १०८ रु४) सोयाबीन तेल---१०२ रु५) सरकी तेल---१०२ रु६) पामतेल---९८ रु

का वाढली करडी तेलाची विक्री?आषाढात विविध पदार्थ तळले जातात. शेंगदाणा तेलाचा वापर केला तर धूर निघतो, यासाठी करडी तेलाचा वापर केला जातो. इतर महिन्यांत सोयाबीन, सूर्यफूल तेलाचा वापर होत असला तरी पदार्थ चवदार बनण्यासाठी करडीचे शुद्ध तेल खरेदीकडे सर्वांचा कल असतो.

का खाल्ले जातात तेलकट पदार्थ?आषाढ महिन्यात पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. कारण, या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते. शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्य बिघडते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते. तसेच तेलकट व गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करतात. तसेच आषाढ महिन्यात चयापचय क्रिया ही देखील चांगली असते. पण जास्त तेलकट पदार्थ खाणेही टाळले पाहिजे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला.

आफ्रिकेतून येणार सोयाबीन तेलयंदा देशात व विदेशात सोयाबीनचे उत्पादन समाधानकारक आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात आफ्रिकेतून सोयाबीन तेलाची आयात होईल. मागील दीड महिन्यापासून खाद्यतेलाचे भाव स्थिर असून पुढेही भाववाढीची शक्यता कमी आहे.- प्रशांत खटोड, व्यापारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न