शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:26 IST

शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.

ठळक मुद्देभाजपचे मत: प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार जिल्ह्यातील राजकारणाबाबत चर्चा

औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यात ज्या ठिकाणी जि.प.,पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.पक्षादेशानुसार काँग्रेस भूमिका घेणार आहे, तर भाजपच्या गोटातून देखील तशीच प्रतिक्रिया युती झाल्यानंतर दिली होती. जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ तीन महिने राहिला आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या आदेशानुसार निर्णय होईल, असे शिवसेनेचे मत आहे.जिल्ह्यात जि.प., औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेससोबत आहे, तर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्ह्यातील या संस्थांतील शिवसेना आणि भाजपने सोयीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली असली तरी आगामी काळातच त्याबाबत निर्णय होणार आहे, तर जिल्हा परिषदेसह कन्नड, सोयगाव व वैजापूर पंचायत समित्यांमधील सत्ता समीकरण बदलणे शक्य आहे.प्रदेशाध्यक्षांना भेटणारयुती झाली हे चांगलेच झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमताने काम करतील; परंतु काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषदेत व जिल्ह्यातील संस्थांमध्ये स्थापन केलेल्या सत्तेतून बाहेर पडावे, ही भाजपची भूमिका आहे. भाजप जिथे-जिथे राष्ट्रवादीसोबत असेल, त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. यासाठी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली जाईल, असे उपाध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना