शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

शिवसेनेने जिल्हा परिषदेतील काँग्रेससोबतची युती तोडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:26 IST

शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.

ठळक मुद्देभाजपचे मत: प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन करणार जिल्ह्यातील राजकारणाबाबत चर्चा

औरंगाबाद : शिवसेनेने जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडावी. अध्यक्षपदाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे. तो नंतर घेता येईल; परंतु सध्या काँग्रेसला सत्तेतून बाहेर करावे. यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांची तातडीने भेट घेण्यात येईल, असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी केले.लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यात ज्या ठिकाणी जि.प.,पंचायत समित्या किंवा नगरपालिकांमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सेना किंवा भाजपसोबत केलेली अभद्र आघाडी तात्काळ तोडण्याचे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.पक्षादेशानुसार काँग्रेस भूमिका घेणार आहे, तर भाजपच्या गोटातून देखील तशीच प्रतिक्रिया युती झाल्यानंतर दिली होती. जि.प. अध्यक्षांचा कार्यकाळ तीन महिने राहिला आहे. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या आदेशानुसार निर्णय होईल, असे शिवसेनेचे मत आहे.जिल्ह्यात जि.प., औरंगाबाद पंचायत समिती, कन्नड पंचायत समिती, सोयगाव पंचायत समितीमध्ये शिवसेना काँग्रेससोबत आहे, तर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपसोबत राष्ट्रवादीची आघाडी आहे. जिल्ह्यातील या संस्थांतील शिवसेना आणि भाजपने सोयीनुसार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केलेली असली तरी आगामी काळातच त्याबाबत निर्णय होणार आहे, तर जिल्हा परिषदेसह कन्नड, सोयगाव व वैजापूर पंचायत समित्यांमधील सत्ता समीकरण बदलणे शक्य आहे.प्रदेशाध्यक्षांना भेटणारयुती झाली हे चांगलेच झाले आहे. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमताने काम करतील; परंतु काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेने जिल्हा परिषदेत व जिल्ह्यातील संस्थांमध्ये स्थापन केलेल्या सत्तेतून बाहेर पडावे, ही भाजपची भूमिका आहे. भाजप जिथे-जिथे राष्ट्रवादीसोबत असेल, त्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत. यासाठी प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली जाईल, असे उपाध्यक्ष डॉ. कराड यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणShiv Senaशिवसेना