शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा वाढविण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:20 IST

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या  उपस्थितीत मंगळवार  दि. २२  रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.

औरंगाबाद : कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या आणि ऑक्सिजनचा साठा वाढवावा, अशी मागणी  औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या  उपस्थितीत मंगळवार  दि. २२  रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.

आ. हरिभाऊ बागडे आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जि. प. मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर पोलीस  अधीक्षक गणेश गावडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे, डॉ. सुंदर  कुलकर्णी  व डॉ. नीता पाडळकर यांची यावेळी उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे  प्रमाण ७६ टक्के असून ते समाधानकारक आहे.  रूग्णवाढीच्या  पार्श्वभूमीवर आवश्यक औषधी, खाटा, ऑक्सिजन पुरवठ्यासह पूरक उपचार सुविधा जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात सध्या उपलब्ध असल्याचा दावाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. 

यावेळी बोलताना आ. बागडे म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काेरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब  रूग्णांना योजनेचा  लाभ  मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बाजारपेठा, दुकाने  ठराविक वेळात बंद करणे बंधनकारक असले  तरी  अनेक  ठिाकणी या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे यासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचे आ.  जैस्वाल यांनी या  बैठकीत सांगितले. तर आयसीयू, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या, ऑक्सिजन साठा वाढविण्यासोबतच घाटीत विनाखंडित वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य