शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन साठा वाढविण्याची लोकप्रतिनिधींची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 14:20 IST

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या  उपस्थितीत मंगळवार  दि. २२  रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.

औरंगाबाद : कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या आणि ऑक्सिजनचा साठा वाढवावा, अशी मागणी  औरंगाबाद शहरातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या  उपस्थितीत मंगळवार  दि. २२  रोजी झालेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय प्रमुख सहभागी झाले होते.

आ. हरिभाऊ बागडे आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, जि. प. मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले,  अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, अप्पर पोलीस  अधीक्षक गणेश गावडे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त संजीव काळे, डॉ. सुंदर  कुलकर्णी  व डॉ. नीता पाडळकर यांची यावेळी उपस्थिती होती. 

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे  प्रमाण ७६ टक्के असून ते समाधानकारक आहे.  रूग्णवाढीच्या  पार्श्वभूमीवर आवश्यक औषधी, खाटा, ऑक्सिजन पुरवठ्यासह पूरक उपचार सुविधा जिल्ह्यात आवश्यक प्रमाणात सध्या उपलब्ध असल्याचा दावाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केला आहे. 

यावेळी बोलताना आ. बागडे म्हणाले की, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत काेरोना संसर्गाच्या संकटाचा विचार करून गरीब  रूग्णांना योजनेचा  लाभ  मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर अधिक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बाजारपेठा, दुकाने  ठराविक वेळात बंद करणे बंधनकारक असले  तरी  अनेक  ठिाकणी या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे यासंबंधीचे नियम अधिक कडक करण्याची गरज असल्याचे आ.  जैस्वाल यांनी या  बैठकीत सांगितले. तर आयसीयू, व्हेंटिलेटर, खाटांची संख्या, ऑक्सिजन साठा वाढविण्यासोबतच घाटीत विनाखंडित वीजपुरवठा ठेवावा, अशी मागणी दानवे यांनी केली.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादHealthआरोग्य