शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

अजिंठा-गौताळा पर्यटन प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 19:42 IST

गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे.

ठळक मुद्देपर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध

औरंगाबाद : अजिंठा ते गौताळा या पट्ट्यात एकूण ३३ पर्यटन स्थळे आहेत. गडकिल्ले तसेच वनराईने नटलेला हा भाग पर्यटनाच्या दृष्टीने संपन्न अजूनही दुर्लक्षित आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉर असावा आणि त्यासाठी विशेष पर्यटन प्राधिकरण असावे, अशा मागणीचे निवेदन दि. २८ रोजी विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना देण्यात आले.

यावेळी गणेशवाडी कृषी व ग्रामीण विकास संस्था उंडणगावचे अध्यक्ष आर्किटेक्ट अनिरुद्ध नाईक, जय फाऊंडेशनचे संजय कु लकर्णी यांनी यासंदर्भातील सादरीकरण तयार करून ते आयुक्तांना दाखविले. सुनील मोटे, विजय चौरंगे, विनय पाटणी, दामोदर मोरे, सदाशिव राठोड, संतोष बिसने, नंदकिशोर कुलकर्णी यांची यावेळी उपस्थिती होती.   सादरीकरणादरम्यान या भागातील निसर्ग समृद्धी पाहून आयुक्तांनी अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉरसाठी प्राधिकरण स्थापन करण्याचे आश्वासन दिले. या परिसरातील स्थानिक धार्मिक पर्यटनातून होणारी आर्थिक उलाढाल याविषयीही यादरम्यान चर्चा झाली. 

मराठवाडा व खान्देश यांना विभागणाऱ्या अजिंठा डोंगररांगांची एकूण लांबी १२५ किमी असून, बुलडाणा येथील जाईचा देव येथून ते पितळखोरा पाटणादेवीपर्यंतचा हा परिसर आहे. हा संपूर्ण परिसर गौताळा अभयारण्यासाठी राखीव असून, यादरम्यान वेताळवाडीचा किल्ला, जंजाळ्याचा किल्ला, अंतूरचा किल्ला, सुतोंड्याचा किल्ला, इतिहासातील इतर सैनिकी चौक्या आहेत. यासोबतच वडाली, अजिंठा, रुद्रेश्वर, धारेश्वर, पितळखोरा हे महत्त्वपूर्ण धबधबे आहेत. 

कालदरी, भिलदरी, जाईचा देव, जगदंबा माता वाढोणा, अंबऋषी देवस्थान, रुद्रेश्वर मंदिर, मुर्डेश्वर मंदिर, कळसाई मंदिर, घाटनांद्राजवळील इंद्रगडी, जोगेश्वरी, मनूआई मंदिर, पिनाकेश्वर मंदिर, धारेश्वर मंदिर, पाटणादेवी मंदिर यासारख्या धार्मिक  स्थळांनीही हा भाग समृद्ध आहे. २५० प्रकारचे पक्षी, विविध प्रकारचे प्राणी व वनस्पतींच्या विविध जाती या भागात आढळून येतात. 

पर्यटनाच्या दृष्टीने हा परिसर समृद्ध असून, अजिंठा-गौताळा टुरिझम कॉरिडॉर पर्यटन प्राधिकरणामुळे या भागातील पर्यटन क्षेत्रातील विस्कळीतपणा दूर होऊन पर्यटकांची ये-जा सुरू होईल आणि यातून रोजगार निर्मिती होईल, असे म्हणणे यावेळी मांडण्यात आले.

टॅग्स :tourismपर्यटनAjantha - Elloraअजंठा वेरूळforestजंगल