शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पाण्याच्या शोधातील हरणाचा विहिरीत पडून मृत्यू; पाणवठे आटल्याने परिस्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 17:45 IST

परिसरातील पाणवठे आणि धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी मृत साठ्यावर असल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत.

ठळक मुद्देपाण्यासाठी वन्यप्राण्यांचा मोर्चा शेताकडे वळला आहे.

सोयगाव :  पाण्याच्या शोधात कळपातून भरकटलेल्या नर जातीच्या हरणाचा विहिरीत पडून बुडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना जरंडी शिवारात शुक्रवारी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून हरणाचा मृतदेह बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. 

सोयगावसह परिसरात उन्हाची वाढलेली दाहकता वाढली आहे. परिसरातील पाणवठे आणि धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी मृत साठ्यावर असल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी वन्यप्राण्यांचा मोर्चा शेताकडे वळला आहे. कोरडेठाक झालेल्या पाणवठ्याने वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी रखरखत्या उन्हात शिवाराकडे येत आहेत. यातच जंगलातील अन्न आणि पाण्याचा टंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आलेल्या कळपातून भरकटलेल्या नर जातीच्या हरिणाला पिण्याच्या पाण्यासाठी जीव गमवावा लागला आहे. 

याबाबत वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा  केला. ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृत हरिणाला बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश सपकाळ, वनरक्षक माया जिने, वनमजूर गोविंदा गांगुर्डे, अमृत राठोड, छगन झाल्टे, ओम बिरारे आदींनी मृत हरिणाला विहिरीतून बाहेर काढून त्यावर शेतातच अंत्यसंस्कार केले.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद